कैकदा आले रूतू पण वांझ गेले
दुःख हे माझे बिचारे गांजलेले
कत्तली करतील ते सोयीप्रमाणे-
शब्द त्यांच्या दावणीला बांधलेले
मोकळे आकाश तू जेव्हा दिले
मुक्त झाले श्वास माझे कोंडलेले
वादळाने कालच्या उद्ध्वस्त केले-
खेळ अपुले वाळवंटी मांडलेले
पेरले होते जिथे मी स्वप्न माझे
ऐनवेळी शेत सारे बांड गेले
इतिहासही "त्यांचेच' गातो गोडवे
व्यर्थ गेले रक्त माझे सांडलेले
येथे जरी मी दूर तुजपासूनी-
"त्या' तिथे काळीज माझे टांगलेले
विजयकुमार राउत
...............................