अक्षरांशी ओळख झाल्यापासून शब्दांची प्रत्येक छटा
अनोखी आणि चमत्कारीक वाटत आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे
आम्हा कफ्ल्लकाजवळ शब्द आणि अक्षरांच्या धनाशिवाय दुसरे असते तरी काय? आयुष्याच्या
प्रत्येक वळणावर शब्दच तर आपल्याला जागोजागी रूप पालटून वारंवार भेटत असतात. पण ते
बहुरूपी नसतात बरे. अशा प्रामाणिक शब्दांतून विश्वास, प्रेम, ममता, मैत्री, आपुलकी
व सांत्वना मिळत असते. बोबडया बोलांचे कौतुक वाटण्याइतके पालकत्व अंगी असावे लागते.
शब्दच अंधारलेल्या रात्री आपल्याला साथ देत मदतीला धावून येतात. मग आपल्या मनातील
भावनांना शब्दांचे अंकूर फुटून त्यांचे "कॅथार्सिस' होत असते. ही क्रिया घडली नाही
तर सगळया सृष्टीलाच वेड लागेल. शब्दच नसतील तेव्हा सारे जग मुके होउन जाईल. ही
स्मशानशांतता मनाला अस्वस्थेच्या खाईत लोटण्याइतकी भयंकर असेल. भावनांना वाट मिळाली
नाही तर त्यांचे "बॉंब' होउन निष्पाप वस्तीवर कोसळतील व सगळे विश्व बेचिराख करून
टाकतील. म्हणून शब्द हे आयुध असले तरी ते जपून वापरायचे असतात, याची जाण असणे
आवश्यक असते. मौनात शब्दांना पुरून उरणारी ताकत असली तरी तीही एका मर्यादेपर्यंतच.
हे निःशब्द मौन जर गैरसमजाचे वादळ निर्माण करीत असेल तर सगळा अनर्थच होउन जाईल. तसा
शब्दांचाही गोंधळ झाला की त्याचे दूरगामी परिणाम होतच असतात. माणसाला गरजेच्यावेळी
शब्दांची गरज पडणारच. मनातील भावनांचे विरेचन करायला शब्दांशिवाय दुसरे उत्तम साधन
नाहीच. तसेंही आपण विश्वातल्या कुठल्याही गोष्टीला शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा
प्रयत्न करीत असतो आणि तसे झाले तर समाधानही मानत असतो. परंतु सत्य हे पा-यासारखे
हातून निसटूनच जाते, हे मात्र खरे. सत्याची एक तृतियांश बाजूच कधी कधी आपल्या हाती
लागत असते. आपण तेव्हा सत्य गवसल्याचा विजयोत्सव साजरा करीत असतो.
शब्द जेव्हा चौखूर उधळायला लागतात तेव्हा सगळे विश्व कमी पडते. शब्द अर्थांची पर्वा न करता आपल्या धुंदीत जगत असतात. अशा शब्दांना कुणाच्या शिफारसींची गरज नसते. त्या शब्दांचे मग आपल्याला कोण अप्रुप वाटायला लागते. त्यांच्या ठिकाणी असलेले सामर्थ्य आपल्या अंगी यावे, म्हणून मग सुरू होतो शब्दांचा शोध. या जगात शब्दांची पुजा करणारे सच्चे शब्दयोगीही कधी कधी पुस्तकांतून भेटत असतात. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा मोगरा तेव्हा हळूवार बहरून येतो. ज्ञानेश्वरीतील नाजूक भाव, तुकारामांचा विद्रोह, कबिरांची सत्यवाणी, नामदेवांची भक्ती रूपी श्रद्धा यात ईश्वर दिसायला लागतो. मनाचा मोर शब्दांभोवती धुंद होउन पिंगा घालायला लागतो. जीवनातील अर्थ शोधण्यांचा प्रवास सुरू असतानाच माणूस होण्याची प्रक्रियाही निरंतर सुरू असते. शब्दांवरची धुळ बाजूला सारली की आतील नितळ, पारदर्शी अर्थाचा तळ हाती लागतो आणि मग स्वर्ग दोन बोटांवरच उरतो.
तसे पाहिले तर या प्रवासात अनेक धोके जाणवतात. अस्सल शब्दांचे मुखवटे धारण करून नकली शब्दांचे फवारे उडविणा-यांचेही मग दुनियेत पिक यायला लागते. "क्रियेविण वाचाळता, व्यर्थ' याप्रमाणे स्वतःचा उदोउदो करून घेणारे पायलीचे पन्नास भेटतात. स्वतःला शब्दांचा मसिहा समजणारे मग अर्थांचा अनर्थ करून शब्दांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे शब्द मोठे घातक असतात. आम्हीच सृष्टीचे संचालक म्हणून आभास निर्माण करण्याचे षडयंत्र रचणारे असतात. काही शब्द आश्वासक होण्याचे नाटक करीत असतात. ते तर दर पाच वर्षांनी हमखास आपल्याला भेटून आश्वासनांची खैरात वाटत दारोदार फिरतात. असे शब्द बनावट असतात, नकली नोटांसारखे. म्हणून तितकेच ते कावेबाजही असतात. अशांपासून जपूण राहणेच उत्तम. शब्दांच्या कोरडया पावसावर तहानलेल्या कंठाची तृष्णा नसते शांत होत. नाहीतर आपण निरर्थक शब्दांच्या भूलथांपाना बळी पडून जागोजागी लुबाडले जाण्याचीच शक्यता अधिक. शब्दांशी लबाडी केली की ते जीवावरही उठतात. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मग असंख्य शब्दांच्या कत्तली पाडल्या जातात. अशावेळी छिन्न विछिन्न झालेल्या मनाला प्रत्येक शब्दच खोटा वाटत असतो.
शब्द फार नटखट असतात. कधी कधी ते हातातून ऐनवेळी पा-यासारखे निसटूनही जातात. मग त्यांच्या मागे आपण पाठशिवनीचा खेळ खेळत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत असतो. नेमक्या वेळी शब्द दगा देतात. आपणच आपल्यावर चिडतो. त्रागा करीत आगपाखड करतो. अशावेळी कोण्या एका जुनाट, पडक्या वाडयाखाली ग्रेसची भग्नता मनाच्या खोल गाभा-यात हमसून हमसून रडते आणि आपणही आतल्या आत धुमसत जातो निखा-यासारखे.
आपल्याला नाहीच होता आले कुणाच्या दुःखाचे वाटेकरी, तरी शब्दांनी कुणाच्या जखमेवर फुंकर घातली तर जन्म सार्थकी झाल्याचे समाधान असावे. शब्द मनाला उर्जा देणारे असावे किंवा अन्यायाविरूद्ध आग ओकणारेही. परंतु कधी कुसमाग्रजांच्या कवितेतील नायकाच्या "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा' अशी स्फूर्ती देणारे शब्द केव्हाही आदरनीय. असे शब्दच माणसाला माणूसपण प्राप्त करून देणारे असतात. म्हणून ते प्रिय व पुजनीय असतात. कधीतरी एखादा शब्द भेटतो आणि आयुष्यच बदलून जाते. आयुष्याला अर्थ लाभतो. वरून नारळासारखे टणक वाटणारे शब्द आत मात्र खूप मउशार असतात. केवळ "ट'ला "ट' जोडून होत नसते शब्दांची इमारत उभी. आणि झालीच तर ती केव्हा कोसळून पडेल, याचाही नेम नसतो. तिथे लागते शब्दांची सच्चाई. हे खरेपण, ही प्रामाणिकता टाकीचे घाव सोसल्याशिवाय कशी बरी येईल?
पैसा कमविण्यासारखे शब्दही कमवावे लागतात. कारण तिच खरी कमाई असते. प्रत्येकाला होता येत नसते शेक्सपिअर, मदर टेरेसा किंवा महात्मा. म्हणून काय कुणी काही करूच नये? स्वतःला या शब्दांच्या परिघाबाहेरचा अर्थ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे कधीही उत्तम. "ध' चा "मा' करून शब्दांना बदनाम करणा-यांचे मनसुबे उधळण्यातच माणूसकी दडलेली आहे. त्यासाठी जीवनाच्या झोतभट्टीत शब्दांना तावून सलाखून दोस्ती करण्याची खबरदारी घेणे केव्हाही चांगले. शब्दांचा पारिजात अंगणात फुलण्यासाठी त्याची जपणूक माळी होउनच करावी लागते. शब्दांची निःसंशय मनाने पुजा बांधली तर मग आपोआपच सुरू होतात त्यांच्याशी इमान राखण्याचे चिरंतन सोहळे. "आशयाचा तुच स्वामी, शब्दांवाही मी भिकारी' मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे, शब्दांचा आशय, जे परतत्व तुझ्यात दडलेले आहे, ते कळण्याइतकी बुद्धी आम्हाला लाभल्यास शब्दांना कल्हई देण्याची दुर्बुद्धी सुचणार नाही.
विजयकुमार राउत
साईनगर, हिंगणा मार्ग
8888403264
शब्द जेव्हा चौखूर उधळायला लागतात तेव्हा सगळे विश्व कमी पडते. शब्द अर्थांची पर्वा न करता आपल्या धुंदीत जगत असतात. अशा शब्दांना कुणाच्या शिफारसींची गरज नसते. त्या शब्दांचे मग आपल्याला कोण अप्रुप वाटायला लागते. त्यांच्या ठिकाणी असलेले सामर्थ्य आपल्या अंगी यावे, म्हणून मग सुरू होतो शब्दांचा शोध. या जगात शब्दांची पुजा करणारे सच्चे शब्दयोगीही कधी कधी पुस्तकांतून भेटत असतात. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा मोगरा तेव्हा हळूवार बहरून येतो. ज्ञानेश्वरीतील नाजूक भाव, तुकारामांचा विद्रोह, कबिरांची सत्यवाणी, नामदेवांची भक्ती रूपी श्रद्धा यात ईश्वर दिसायला लागतो. मनाचा मोर शब्दांभोवती धुंद होउन पिंगा घालायला लागतो. जीवनातील अर्थ शोधण्यांचा प्रवास सुरू असतानाच माणूस होण्याची प्रक्रियाही निरंतर सुरू असते. शब्दांवरची धुळ बाजूला सारली की आतील नितळ, पारदर्शी अर्थाचा तळ हाती लागतो आणि मग स्वर्ग दोन बोटांवरच उरतो.
तसे पाहिले तर या प्रवासात अनेक धोके जाणवतात. अस्सल शब्दांचे मुखवटे धारण करून नकली शब्दांचे फवारे उडविणा-यांचेही मग दुनियेत पिक यायला लागते. "क्रियेविण वाचाळता, व्यर्थ' याप्रमाणे स्वतःचा उदोउदो करून घेणारे पायलीचे पन्नास भेटतात. स्वतःला शब्दांचा मसिहा समजणारे मग अर्थांचा अनर्थ करून शब्दांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे शब्द मोठे घातक असतात. आम्हीच सृष्टीचे संचालक म्हणून आभास निर्माण करण्याचे षडयंत्र रचणारे असतात. काही शब्द आश्वासक होण्याचे नाटक करीत असतात. ते तर दर पाच वर्षांनी हमखास आपल्याला भेटून आश्वासनांची खैरात वाटत दारोदार फिरतात. असे शब्द बनावट असतात, नकली नोटांसारखे. म्हणून तितकेच ते कावेबाजही असतात. अशांपासून जपूण राहणेच उत्तम. शब्दांच्या कोरडया पावसावर तहानलेल्या कंठाची तृष्णा नसते शांत होत. नाहीतर आपण निरर्थक शब्दांच्या भूलथांपाना बळी पडून जागोजागी लुबाडले जाण्याचीच शक्यता अधिक. शब्दांशी लबाडी केली की ते जीवावरही उठतात. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मग असंख्य शब्दांच्या कत्तली पाडल्या जातात. अशावेळी छिन्न विछिन्न झालेल्या मनाला प्रत्येक शब्दच खोटा वाटत असतो.
शब्द फार नटखट असतात. कधी कधी ते हातातून ऐनवेळी पा-यासारखे निसटूनही जातात. मग त्यांच्या मागे आपण पाठशिवनीचा खेळ खेळत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत असतो. नेमक्या वेळी शब्द दगा देतात. आपणच आपल्यावर चिडतो. त्रागा करीत आगपाखड करतो. अशावेळी कोण्या एका जुनाट, पडक्या वाडयाखाली ग्रेसची भग्नता मनाच्या खोल गाभा-यात हमसून हमसून रडते आणि आपणही आतल्या आत धुमसत जातो निखा-यासारखे.
आपल्याला नाहीच होता आले कुणाच्या दुःखाचे वाटेकरी, तरी शब्दांनी कुणाच्या जखमेवर फुंकर घातली तर जन्म सार्थकी झाल्याचे समाधान असावे. शब्द मनाला उर्जा देणारे असावे किंवा अन्यायाविरूद्ध आग ओकणारेही. परंतु कधी कुसमाग्रजांच्या कवितेतील नायकाच्या "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा' अशी स्फूर्ती देणारे शब्द केव्हाही आदरनीय. असे शब्दच माणसाला माणूसपण प्राप्त करून देणारे असतात. म्हणून ते प्रिय व पुजनीय असतात. कधीतरी एखादा शब्द भेटतो आणि आयुष्यच बदलून जाते. आयुष्याला अर्थ लाभतो. वरून नारळासारखे टणक वाटणारे शब्द आत मात्र खूप मउशार असतात. केवळ "ट'ला "ट' जोडून होत नसते शब्दांची इमारत उभी. आणि झालीच तर ती केव्हा कोसळून पडेल, याचाही नेम नसतो. तिथे लागते शब्दांची सच्चाई. हे खरेपण, ही प्रामाणिकता टाकीचे घाव सोसल्याशिवाय कशी बरी येईल?
पैसा कमविण्यासारखे शब्दही कमवावे लागतात. कारण तिच खरी कमाई असते. प्रत्येकाला होता येत नसते शेक्सपिअर, मदर टेरेसा किंवा महात्मा. म्हणून काय कुणी काही करूच नये? स्वतःला या शब्दांच्या परिघाबाहेरचा अर्थ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे कधीही उत्तम. "ध' चा "मा' करून शब्दांना बदनाम करणा-यांचे मनसुबे उधळण्यातच माणूसकी दडलेली आहे. त्यासाठी जीवनाच्या झोतभट्टीत शब्दांना तावून सलाखून दोस्ती करण्याची खबरदारी घेणे केव्हाही चांगले. शब्दांचा पारिजात अंगणात फुलण्यासाठी त्याची जपणूक माळी होउनच करावी लागते. शब्दांची निःसंशय मनाने पुजा बांधली तर मग आपोआपच सुरू होतात त्यांच्याशी इमान राखण्याचे चिरंतन सोहळे. "आशयाचा तुच स्वामी, शब्दांवाही मी भिकारी' मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे, शब्दांचा आशय, जे परतत्व तुझ्यात दडलेले आहे, ते कळण्याइतकी बुद्धी आम्हाला लाभल्यास शब्दांना कल्हई देण्याची दुर्बुद्धी सुचणार नाही.
विजयकुमार राउत
साईनगर, हिंगणा मार्ग
8888403264