बोचले काटें जरी मज वेदना का होत नाही हाय! डोळयांतून माझया आसवे का येत नाही गोड या कंठातील का संपली कोकिळगाणी? माझियासाठी तसा हा चांगला संकेत नाही जीवनाचा डाव माझया खेळणारा मीच होतो दोष माझया हारण्याचा मी कुणाला देत नाही या उन्हाचा सोयरा मी, यातनांचा मी प्रवासी सावलीला झाड कोठे, येथल्या वाटेत नाही ते तुझी गातात सुक्ते, भावभोळया रे विठोबा एकदा त्यांच्या मनाचा ठाव का तू घेत नाही काल ज्या गावात माझी चौकशी केली न कोणी आज त्या गावात माझा जावयाचा बेत नाही संपली जेव्हा तयांच्या जींदगानीची कहाणी एकही ताजा निखारा राहिला राखेत नाही -विजयकुमार राउत | |||
-