Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शनिवार, 22 अगस्त 2015

का रे हा दुरावा ?


                                                   * विजयकुमार राऊत


भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सभोवताली
या ह्रदयाची त्या ह्रदयाला "रेंज' मिळेना !!


युवा गझलकार प्रसेनजित गायकवाड यांच्या या कधीकाळी ऐकलेल्या ओळी मनात घर करून गेल्या. एकविसाव्या शतकात हे असे एककल्ली आयुष्य आपल्या सर्वांच्या वाटयाला येईल, असं कदाचित कुणाला वाटलं नसेल. परंतु ही मानवी जीवनातील अपरिहार्यताच असते. आपण भौतिक वस्तूमध्ये सुख शोधण्याच्या आधीन होत गेलो की त्याचे दुष्परिणामही थोडेफार भोगावे लागतात. सर्वप्रथम मानवी उत्क्रांतीच्या प्राथमिक काळात भावना व्यक्‍त करण्यासाठी अगोदर शब्द जन्माला आला. त्यानंतर भाषा, संभाषण, संवाद आणि सुसंवाद आदी कौशल्ये टप्प्या टप्प्याने विकसीत होत गेली. लगेच उपयुक्‍ततेची मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचे विपर्यासात रूपांतर व्हायला वेळ लागत नसतो. आजच्या घडीला वर्तमान काळाचे अवलोकन केल्यास अगदी तिच स्थिती आपल्यापुढे निर्माण झाली, असे म्हणणे गैर होणार नाही.
कोणे एके काळी संवाद कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याला दूरच्या प्रिय व्यक्‍तीशी संवाद साधायला साधने उपलब्ध नसल्यामुळे मानवासमोर अनेक प्रश्‍न उभे राहिले. त्याने भौतिक साधनांची निर्मीती करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. महाकवी कालिदासाने "मेघदुत' सारख्या काव्यातून प्रेयसीापर्यंत संदेश पोहचवायला आकाशातील काळयाकुट्‌ट मेघांना आवाहन केले. ही कविकल्पना जरी असली तरी त्यामागे प्रेयसीपर्यंत ह्रदयातील संवाद तातडीने पोहचावा ही तगमग होती. कुठलीही कल्पना ही सुरवातीच्या काळात कल्पना असते आणि पुढे तिच मुर्त रूप धारण करते. पुढच्या काळात भावनेतून संवाद साधण्याची निकड भासू लागली.
पंख होती तो उड आती रे रसिया ओ बालमा
तुझे दिल का दाग दिखलाती रे...!!

या गीतातील नायीका प्रियकराशी संवाद साधण्यासाठी किती अस्वस्थ आहे, हे कळायला त्या प्रेयसीशीच तादात्म पावावं लागेल. दूरदेशी असलेल्या आपल्या काळजाच्या तुकडयाला मनातील व्यथा कळायला त्या आईच्या भावनांशीच एकरूप व्हावं लागेल. कुठलीही भावनीक अस्वस्थता माणसाला एका वेगळया पातळीवर नेउन ठेवते. ती व्यक्‍ती कवी असेल तर ती शब्दातून भावनेचा फुलोरा फुलविते आणि जर संशोधक वृत्ती असेल तर एखाद्या कल्पनेला मूर्त रूप मिळते. गरजेतून निर्माण झालेल्या मानसिक अस्वस्थेच्या काळात संदेश पोहचविण्यासाठी कुठल्यातरी माध्यमाशी जवळीक साधण्याची अस्वस्थता निर्माण झाली. इतिहासात डोकावलं तर राजा- महाराजांच्या काळात कबुतराच्या माध्यमातून संदेश पोहचविण्याचे तंत्र त्याकाळीही मानवानेच शोधून काढले. पुढे त्याचा वापर एका राज्यातून दुस-या राज्यात महत्वाचा संदेश पोहचविण्यासाठी होउ लागला. दूतांकरवी परस्परांना निरोप पाठविणे हेही ओघाने आलेच. त्याहीपूर्वीच्या काळी काही साधू, सन्याशी, योगाचार्य समाधी अवस्थेत दूरवरच्या व्यक्‍तीशी संवाद साधत असल्याची उदाहरणे मिळतात. अर्थात हा उपाय सर्वसाधारण माणसाच्या अवाक्‍यातला नसल्यामुळे आणि तेवढे योगसामर्थ्य अंगी नसल्यामुळे सर्वसामान्यांची मात्र गोची झाली असावी. सर्वसामान्यांनी प्रिय व्यक्‍तीला संदेश देण्यासाठी आपापल्या त-हेने उपाय शोधून काढण्याची कामगिरी पार पाडली.
आजच्या माहिती -तंत्रज्ञानाच्या युगात अनेक साधनांचा वापर संवादासाठी केला जातो. मोबाईल फोनचा जन्मही त्यातला महत्वपूर्ण टप्पाच म्हणावा लागेल. आज त्यानं आपलं अख्खं आयुष्यच व्यापून टाकलं आहे. दुस-या महायुद्‌धाच्या काळात टेलिफोन अस्तित्वात आला. त्या टेलिफोनचे सर्वांना काय अपृफ !
मेरे पिया गये रंगून, वहासे किया है टेलिफून
तुम्हारी याद सताती है.. जिया मे आग लगाती है!
असे नटून थटून भावविभोर स्थितीत गात असलेल्या नायीकेला दूरदेशी गेलेल्या आणि तेथून फोनवर बोलणा-या नायकाचा किती अभिमान ! 1940 च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली. पुढील तीन दशके यावर सखोल संशोधन झालं. ग्राफिक्‍स इन 3, एप्रिल 1973 ला ग्राफिक आउटला पहिला मोबाईल कॉल आला. मोटोरोला कंपनीचे इंजिनिअर मार्टीन कुपर यांनी हा कॉल केला होता. तो प्रोटोटाईप पद्‌धतीचा मोबाईल फोन होता. या घटनेला बरोबर चाळीस वर्ष झाले. केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल आता स्मार्ट फोन झाला.
एकवीसाव्या शतकात स्टीव्ह जॉब्ज या युवा संशोधकाने आय फोनचा शोध लावला आणि तो तरूणांच्या गळयातील ताईत झाला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आतातर संवाद साधण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. मित्रहो नव्वदच्या दशकात घरोघरी "ब्लॅक अँड व्हाईट' टिव्ही उपलब्ध होता. त्यावेळी केवळ दूरदर्शनखेरिज कुठलेच चॅनल आपल्याकडे उपलब्ध नव्हते. टिव्हीवरचे कुठलेही रटाळ कार्यक्रम पाहणे सर्वांना ठाउक होते. नंतर रंगीत टिव्हीच्या जमान्यात शेकडो चॅनल येताच ती झटपट बदलण्यासाठी रिमोटच हाती आला. त्यामुळे "क्षणात बदलती झटपट चॅनल...क्षणात फिरूंनी उणिव दिसे' अशी स्थिती झाली. आता तर खाता पिता बायकोशी बोलण्याला "व्हॅट्‌स अप'चा वापर होउ लागला. प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूची बातमी तेरवीच्या दिवशी मिळण्यात डाकसेवेला लागणारा कालावधी आणि त्यातील गमती जमती आता संपुष्टात आल्यात. इंटरव्हयू झाल्यानंतर हमखास मिळणारा नोकरीचा कॉल हा आयुष्याची घडी विस्कटण्यात महत्वाची भूमीका बजावित असल्यामुळे आता तसे काही उरले नाही. आजच्या काळात क्षणात मिळणारा संदेश जीवनात एक नवीन बदल घडविणारा आहे. उपयोगीतेच्या दृष्टीतून त्याचे महत्व अबाधित असले तरी मनात उभी दरी निर्माण करण्यातही संदेशाच्या माध्यमाचा महत्वाचा वाटा आहे, हेही आता लक्षात घ्यावं लागेल. मुलगा, बाप, भाउ, बहिण, प्रेयसी आणि मित्र यांच्यात परस्परात वाढलेला दुरावा आज विकोपाला पोहचल्याचे चित्र समाजात उभे राहिले आहे. त्यातून नवीन प्रश्‍न आपणच जन्माला घातले आहेत. आठवून बघा याअगोदरचे आयुष्य. त्याकाळात एकमेकांशी संवाद साधण्यात अडचणी जरी असल्या तरी त्यात आरोपाची जागा नव्हती. होता फक्‍त लडीवाळपणा. लटकी तक्रार आणि लटका राग. त्यातही परस्परांना वाटणारी मौज. नात्यांत निर्माण झालेला गोडवा. आज एड्‌सपेक्षा भयंकर विसंवादाच्या नव्या आजाराने शल्यही मनात निर्माण केले. दोन पिढया, दोन मनं, दोन मित्र , प्रेमीयुगल आणि नातलग यांच्यात सुवांदाऐवजी विसंवाद कानी पडतात. यातून नात्यांचा विस्फोट होत असेल तर त्यांना जोडणारे एखादे भावनांचे "सॉप्टवेअर' शोधून काढता येईल का? आईवडिल आणि मुलातील दुराव्याला "जनरेशन गॅप'चे नाव तरी देता येईल. परंतु पती-पत्नी , प्रेमीयुगूल, मित्र आणि आप्तस्वकीयांतील दुराव्याला खतपाणी देण्याचं काम या गॅझेट्‌समुळे होत असेल तर त्याला काय म्हणावे? माणूस एकलकोंडा होणे हे उत्तम आरोग्याचे प्रतिक नसून मानसिक आजाराचे लक्षणच होत आहे. अतिरेक हा कधीही घातकच. शायर जोश मलीहाबादी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर...
जो दिल की है, वो बात नहीं होती !
जो दिन न हो, वो रात नहीं होती !!
मिलते तो है अक्‍सर, जमाने से जोश !
पर अपने आप से मुलाकात नहीं होती !!

नवनवीन संशोधनांनी मानवी जीवनात विकासाची पहाट तर उगवली, पण तिला पुन्हा काळोखाची किनार लाभू नये, किमान एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

                                             विजयकुमार राऊत

मंगलवार, 18 अगस्त 2015

सारे जहा से अच्छा....


विविधतेने नटलेल्या भारतभूतील प्रत्येक राज्याने हातातील बोटांप्रमाणे आपापले वैशिष्टय जपले आहे. बाराव्या शतकातील जगन्नाथपुरी मंदिरातून निघणारी भगवान जगन्नाथ अर्थात श्रीकृष्णाची रथयात्रा संपूर्ण भारतभर प्रसिद्‌ध आहे. जगन्नाथपूरी जिल्हयातील राजधुवा येथे राहणारे जम्बवेश्‍वर रावतराव यांचे कुटूंब हिंगणा एमआयडिसी परिसरात गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. इथल्या रितीरिवाज आणि परंपरेत ते इतके समरस झाले की त्यांना आता महाराष्ट्रच आपली कर्मभूमी वाटायला लागले आहे. इथल्या सण उत्सवाच्या वेळी त्यांना आपले गाव आणि एकंदर राज्यच दिसते. परक्‍या राज्यात कसे काय रमलो, यांचे त्यांना मुळीच आश्‍चर्य वाटत नाही. कारण तीस वर्षापूर्वी येथे आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राने कधी परके मानले नसल्याची साक्ष ते देतात.

उमेदीच्या काळात कलकत्ता येथे एका कारखान्यात नोकरी केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात ते श्रीधर श्रीचंदन या मित्रासोबत नागपूरला आले. हिंगणा एमआयडिसीतील "निको अलायकास्टींग' या कारखान्यात त्यांना कॉंन्ट्रॅक्‍टरचे काम मिळाले. काही दिवस येथे काम केल्यानंतर ते मित्रासोबत मुंबईला गेले. तिथे त्यांचे मन रमेना. पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्याकरीता तिथल्या परिस्थितीशी सामना करीत त्यांनी दीड वर्ष "टाईमपास' केला. नागपूरच्या निको कंपनीने त्यांना परत बोलावून घेतले. तेव्हापासून ते एमआयडिसी परिसरात स्थायीक झाले.
सदयस्थितीत एमआयडिसी परिसरात ओडिसा राज्यातील किमान दहा हजार नागरिकांसोबत "लिटील ओडीसा'च येथे वसले आहे. हिंगणा मार्गावरील राजगृहनगरातील घरापासून शिवमंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे जगन्नाथ सेवा समितीची स्थापना करून धार्मिक कार्यक्रमातून त्यांना एकत्र आणण्याचे काम ते करीत असतात. जगन्नाथाच्या भव्य यात्रेतून ते दरवर्षी इतर नागरिकांच्या सहकार्याने ओडिसा संस्कृतीचे दर्शन घडवितात. "हरे राम हरे क्रिष्ण' या अखंड संकीर्तनातून ते धार्मिकतेचा ओलावा जपण्याचं काम करतात. नागपूर शहरात "उत्कल असोशिएशन' नावाने ओडिसा बांधवांचे मोठे संघटन आहे. या संघटनातून त्यांना विविध प्रश्‍न सोडवून घेता येतात. मासे ,भात त्यांचे मुख्य अन्न. इथे मात्र ते कुटूंबासह महाराष्ट्रीय जेवणच पसंत करतात. जेवनात कांदा, लसून ते वर्ज्य मानतात. जगन्नाथांच्या यात्रेच्या वेळी घेतलेल्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्हयातून ओडिसी बांधव एकत्र येतात. सुमारे 30 ते 40 हजार नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. अमरावतीमध्ये त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनाचे केंद्र आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून कला, सांस्कृतिक, परंपरांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या राज्यात आता जातीप्रथा मोडीत निघाल्याचे ते खंबीरपणे सांगतात. ओडिसात महान क्रांतीकारक सुभाषच्रंद्र बोस यांचे पालणपोषण आणि शिक्षण झाल्याचे सांगताना त्यांची छाती इंचभर फुगली नाही तरच नवल.
राज्याचे वैशिष्टय विचारले की ते म्हणतात की ओडिसा राज्यात गावा गावात युवकांसाठी क्‍लब असून त्यातून युवकांना राज्याच्या विकासात कसा हातभार लावता येईल, याचे प्रबोधन केले जाते. कोरापूर, रायगडा, सुंदरगड, मेहरगंज आदी जिल्हे बंजर आहेत. येथे नक्षलावादाची मुख्य समस्या असल्याचे सांगताना त्यांच्या चेह-यावर चिंतेची लकेर उमटते. ओडिसा राज्यातून येणारे बहुतांश लोक एमआयडिसीतील कारखान्यात काम करतात. कुणी प्लंबरचे काम तर कोणी बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. रावतराय यांना तीन मुले आहेत. ज्योतीवल्लभ हा मुंबईत विमा कंपनीत तर दुसरा जगत हा सदया कॉलेजमध्ये शिकतो आहे. गीता ही मुलगी लंडनला दिली. जावई संदीप सिंग सॉप्टवेअर कंपनीत काम करीत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून आज मनासारख्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे समाधान श्री.रावतराय यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसते. बादलकुमर संपतराय, धीरज रावत, रमेश महंतो आदी सहका-यांसमवेत जगन्नाथ सेवा समितीच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करीत असतात. महाराष्ट्राने आपल्यात सामावून घेतल्याबद्‌दल ते राज्याचे आभार मानतात.
वृक्षारोपन हा त्यांचा आवडता छंद आहे. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा ते सल्ला देतात. त्यांच्या परसबागेत विविध वृक्षांची लागवड केल्याचे दिसते. "मोरो देशप्रती मोरा बहुत प्रेम है' त्यांच्या एका वाक्‍यातून त्यांचे देशाविषयीचे विचार कळतात.

                                                 विजयकुमार राऊत


रविवार, 16 अगस्त 2015

रोबोट (लघुकथा)


                                           * विजयकुमार राउत

देर रात ऑफिससे थका हारा लौटने के बाद दीक्षांत बिस्तरपर लेट गया. जल्दही वह गहरी निंदमे खो गया. आधी रातके के बाद उसने एक अजिबोगरीब सपना देखा. सपने मे पती-पत्नी एक दुसरे के साथ जोर जोरसे लढ रहे थे. महिलाने गुस्से मे खुद के हाथोंसे बदनपर मिट्‌टी का तेल डाल ले दिया और माचिस की तिल्लीसे आग लगा दी. आग कि लपेटे उठ रही थी. और वह जोर जोरसे चिल्ला रही थी. देखते ही देखते वह जलकर कोयला हो गयी. कुछ पल सन्नाटा. लेकीन ताज्जुब की बात ! वह महिला कोयले की ढेरसे फिरसे उठकर खडी हुवी. परिजनो के साथ हसती मुस्कुराती बाते करने लगी. आग मे स्नान करने के बाद वह खुद को बडी फ्रेश और आरामदेह महसूस कर रही थी. दुसरे दृष्य मे एक मोटारसायकील की ट्रकके साथ जबरदस्त भीडत हो गयी. मोटारसायकीलस्वार का शरिर छिन्न विच्छीन्न हो गया . कुछ पल बाद कार्टुन फिल्म के किसी पात्र की तरह उसने अपने आप को इकठ्‌ठा कर लिया. गाडी को किक मारी और वह निकल पडा. जैसे कुछ हुवाही न हो. परिक्षा मे फेल होने के कारण एक छात्रने जहर पी लिया. कुछही पलमे वह खुद को बडा फुर्तीला और हलका महसूस कर रहा था ! दरवाजे पर बेल बजने के बाद दीक्षांत का सपना टूट गया. बिस्तरसे उठकर उसने दरवाजा खोला. जमिन पर पडे अखबार को उठाया और पढने लगा ! खबर थी.."गुडगाव के किसी कारखाने मे तकनिकी गलती के कारण एक रोबोटने किसी मजदूर को उठाकर भट्‌टी मे डाल दिया...
                                                                                   विजयकुमार राऊत

..

बुधवार, 12 अगस्त 2015

संथारा की आत्महत्या?


विजयकुमार राऊत


जैन धर्मातील "संथरा' पद्‌धतीने जीवनाचा त्याग करण्यावर सुप्रिम कोर्टाने नुकतीच बंदी आणली आहे. अन्नाचा त्याग करून जीवन संपविणे हे आत्महत्तेच्या कक्षेत येते, असा न्यायालयाचा निर्वाळा आहे. "संथरा' म्हणजे जैन धर्मातील अनेक महत्वाच्या विधींपैकी एक. अशारितीने जीवन संपविण्याचा अधिकार कुणालाच नसून पद्‌धत कुठलीही असो ही आत्महत्याच ठरते, असे कायदा सांगतो. त्यामुळे जैन धर्मातील साधूसंतांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.
दरवर्षी देशात या विधीतून मरण पत्करणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारने आमच्या धर्मात हे थेट हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नत्याग करून जीवन संपविणे म्हणजे आत्महत्या ठरत असेल तर जगात केवळ एकच जैन धर्म अशा त-हेने आत्महत्तेचे समर्थन करतो. हाच मुद्‌दा आपण हिंदू धर्माच्या चालीरितींना लावल्यास याही धर्मातही अशी प्रथा आहे. वारकरी पंथाचे संस्थापक संत ज्ञानेश्‍वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजिवन समाधी घेतली होती. अलिकडे आचार्य विनोबा भावे यांनीही अन्नत्याग करून देह त्यागल्याचे उदाहरण ताजे आहे. ज्या ज्या संतांनी अशाप्रकारे मरण स्वीकारले ते ते आजच्या कायदयाच्या भाषेत आत्महत्तेच्या गुन्हयास कारणीभूत ठरतात. परंतु कायदयाने दंडूका आणण्याची त्यावेळी पद्‌धत नसल्यामुळे ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा अवलंब केला असेल त्यांना त्यांना त्यावेळी दोषी ठरविता आले नाही. हिंदू धर्मातही तशी जीवन संपविण्याची रित होती. आता कायदयाने तशी बंदी घातल्यामुळे सहसा तसे करणारे फारच थोडे आहेत.
अशा पद्‌धतीची आत्महत्या करणे हे पाप नाही का? स्वतःच स्वतःचा अमानुष खून करणे योग्य आहे का? आणि माणूस आत्महत्या का करतो? याचा शोध घेणे मला महत्वाचे वाटते. चित्रपट दिग्दर्शक स्व.गुरूदत्त यांनी आत्महत्तेसारख्या क्‍लेषदायक मार्गाने जीवन संपविले. मुलांच्या गोष्टी सांगणारे संवेदनशील मनाचे साने गुरूजी यांनीही हाच मार्ग अवलंबिला आहे. अनेक चित्रपट अभिनेते किंवा विद्यार्थी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तर त्यामागे अशीच काही धार्मिकतेतील महान तत्वं आहेत का? मुळीच नाही.
चित्रपट तारका व विद्यार्थी यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे आपल्याला नको झालेले जीवन संपवून टाकणे. चित्रपट तारकांना मिळणारे "ग्लॅमर' पुढच्या काळात मिळत नसल्यामुळे त्या यशापशयाच्या दृष्टीकोनातून स्वतःचे जीवन संपवून टाकतात. यशानंतर एकटेपणातून आलेले नैराश्‍य त्यांना आत्महत्तेस प्रवृत्त करीत असते.
विद्यार्थी मात्र आपण अपयशी झाल्याच्या भावनेतून आत्महत्तेचा मार्ग स्वीकारतात. ते पालकांच्या इच्छा, आकांक्षा व स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येत नसल्यामुळे हे जीवन निरर्थक म्हणून ते संपवून टाकतात. शेतकरी नापिकीने आत्महत्या करून संसारातील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करतात. वयात आलेला मुलगा किंवा मुलगी प्रेमात धोका मिळाल्याने किंवा आईवडिलांचा विरोध म्हणून आत्महत्या करतात. कुणी अपमान झाल्याने तर कुणी जीवनाचे ध्येय गाठू न शकल्याने या निर्णयाप्रत जातात. परंतु जैन साधु संन्याशांनी अंगीकारलेले "संथारा' व्रत त्या दर्जाचे मुळीच नसते. कायदा मात्र त्यांना गुन्हेगार ठरविण्याची भाषा करतो. कारण कायदयाला दुसरी भाषाच अवगत नसते.
प्रभू रामचंद्रांनी जिवित कार्य संपल्यानंतर शरयु नदीत जाउन स्वतःला जलसमाधी घेउन या इहलोकातील यात्रा संपविली होती. तर भगवान श्रीकृष्णाने आयुष्याच्या उत्तरकाळात राज्यात निर्माण झालेली यादवी पाहून अत्यंत व्यथीत अंतःकरणाने जंगलात जाउन स्वतःला पारध्याच्या बाणातून इच्छा मरण स्वीकारले. कारण त्यांच्याजवळ आता काहीही करण्यासारखे राहिलेले नव्हते. ज्या कार्यासाठी आपण पृथ्वीतलावर किंवा जन्मास आलो ते पूर्ण झाल्यामुळे मला आता येथे राहण्याचा काळीमात्रही अधिकार नाही, ही त्यामागची भावना असते. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वरांसारखे महापुरूष ज्ञानेश्‍वरीसारखा महान ग्रंथ लिहून झाल्यानंतर संस्कृतातील ज्ञानाची सर्व कोठारे बहुजनांसाठी उघडी करून स्वतः संजिवन समाधीत विसावतात. गुरूदत्त सारखा चित्रपट अभिनेता यश व अपयश दोन्ही बाजू उपभोगून झाल्यानंतर आता कुठलेच काही मिळवायचे बाकी राहिले नसल्यामुळे आता जगण्याचे प्रयोजन काय, असा विचार करतो आणि स्वतःला संपवून घेतो. अतिउच्च पातळीवरील तत्वज्ञानातून स्वतःला संपवून घेण्याचा हा मार्ग आहे. संजिवन समाधी घेण्याची संतांची भावना आणि एखादया तरूणाने किंवा शेतक-याने केलेली आत्महत्या, एकाच दर्जाच्या कशा असू शकतात? एक नैराश्‍येतून तर दुसरी स्वच्छेने एका उदात्त जाणिवेतून स्वीकारलेली गोष्ट आहे.
आपण कोण आहोत, कशासाठी जन्माला आलो व आता तेही करून झाले मग एक दिवसही जगण्याचा अधिकार आपल्याला राहात नाही, ही संतांची भूमीका असते. तर मनासारखे झाले नाही या गटात सर्वसामान्य माणसे येत असल्यामुळे सगळयांची आत्महत्तेमागील भूमीका आपण समजू शकतो.
जीवन मिळाल्यानंतर विशेषतः त्याची जाणिव झाल्यामुळे जगण्याची सुप्त इच्छा निर्माण होणे, ही नैसर्गीक बाब आहे. प्रत्येक जण जीवनावर मनापासून प्रेम करतो. जीवना मनासारखे होत नाही म्हणून तो आत्महत्याही करतो. इच्छा मरणही त्यातलेच. अलीकडे इच्छा मरणाला स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. जीवनाचे होत असलेले हाल कुणाला पाहावत नाहीत. म्हणून तो जीवनाला धिक्‍कारतो. जीवनाची वाट फुलांसोबतच काटयांनीही सजलेली असते, याचा तो विचार करीत नाही. माझे जीवन मला वाटते तसेच असावे, हा हट्‌ट करून जीवनाचे मोल ठरविले जाते. परंतु हेच जीवन म्हणून त्यातील प्रत्येक सुखदुखाचा बाउ न करता जगत जाणे कधीही उत्तम. यालाच जीवन जगण्याची कला म्हणतात आणि ती जीवनाकडूनच आत्मसात करायची असते. जाणिवेच्या उच्च पातळीवरील समाधी किंवा संथारा या पद्‌धती धर्माने स्वीकारलेल्या आहेत. प्रपंचातून सगळे आश्रम, सगळया भूमीका पार केल्यानंतर आता जगून काय उपयोग? सगळे या पृथ्वीतलावर भाडेकरू आहेत. एखादया जन्माला येणा-या नवीन जिवासाठी जागा सोडणेच केवळ हातात आहे. दुस-यासाठी संधी निर्माण करण्याची जागा रिकामी करणे ही संथारा या विधीमागची भूमीका असते. परंतु लोकशाहीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या काळात कायदे सगळयांसाठीच सारखे असल्यामुळे ते विशेष व सर्वसामान्य असा भेद करीत नाही. त्यामुळेच इच्छा मरण, संथरा, संजिवन समाधीला कायदयाचा विरोध आहे. परंतु धार्मिक, सामाजिक, कायदेविषयक बाबी या माणसांच्या समस्येची उकल करण्यासाठी एकमेकांची निर्मीती झाली आहे. धर्म हा कायदा म्हणून कोणे एके काळी अस्तित्वात होता. आता त्याची जागा कायदयांनी घेतल्यामुळे लोकशाहीत कायदयांनाच प्राधान्य देणार हे ठरलेलेच आहे. त्यावेळी धर्म हा सामाजिक पातळीवर सर्वमान्य नसल्यामुळे कायदाव्यवस्थेची गरज पडली, हे ओघाने आलेच. म्हणून कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या हिताकरीता बनलेला आहे. त्याच्यासाठी चांगले ते योग्य आणि त्याच्यासाठी जे अपायकारक ते अयोग्य. शेवटी कायदा दुहेरी भूमीकेत कधीच राहू शकत नाही. म्हणून धार्मिक क्षेत्रात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा धर्म आणि कायदा एकमेकांच्या विरोधात संघर्षाच्या पवित्रयात तयार असतात.

विजयकुमार राऊत


बुधवार, 5 अगस्त 2015

ही भाषा प्रतिकांची !

    


* विजयकुमार राऊत

या भूतलावर मानव प्राणी जन्माला आला आणि त्याने त्याच्या अस्तित्वाचा अमिट ठसा काळाच्या छाताडावर उमटविला. इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याची प्रगती आणि भरभराट फार अल्पावधीतील आहे. त्याच्या कल्पनाशक्‍तीच्या बळावर अख्या ब्रम्हांडाला गवसणी घालण्याचा प्रयत्न त्याने केला. खरंच अप्रतिम आहे, त्याची बुद्‌धीमत्ता. म्हणूनच अतिशय प्राचीन काव्य असलेल्या वेदोपनिषेदांनीही त्याला सलाम केला. नदी-नाले, झरे, इंद्रधनुष्य , आकाश, मेघ, फुलपाखरे पाहून तो अतिशय आनंदीत झाला तर विजांचा गडगडाट, सोसाटयाचा वारा, जोराचा पाउस पाहून तो घाबरलाही. सृजनाचा सोहळा उघडया डोळयांनी पाहात असताना तो सृष्टीच्या विविध रूपात अगदी हरखून गेला आणि मृत्यूचे तांडव अनुभवताना अतिशय दुःखीही झाला. तरीही यातून स्वतःच्या बुद्‌धी आणि गुणवत्तेच्या जोरावर त्याने नेत्रदीपक यश मिळविले, याचे आश्‍चर्य वाटायला नको. निसर्गतः अनुभव आणि स्मृतींचा साठा त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्याला हे सगळं शक्‍य झालं. त्याने एवढी प्रचंड झेप घेतली ती स्वकर्तृत्वाच्या बळावर.
स्मृतितून ज्ञान जपून ठेवणे आणि आलेल्या प्रसंगातून कसे सावधपणे जीवन जगायचे, याचा धडा घेणे, ही ज्ञान मिळविण्याची त्याची अगदी साधी, सोपी पद्‌धत. जीवन जगत असताना तो सर्वात अगोदर निसर्गातील निरीक्षणे डोळयांनी नोंदवित गेला. पुढे अनुमानातून त्याची वारंवार पडताळणी करीत गेला. त्यातून मिळालेले ज्ञान जवळच्या लोकांना देत गेला. ज्ञानाची आदानप्रदान करताना त्याने निवडलेली भाषा ही शिल्प, चित्र, नृत्य, काव्याची होती. हजारो वर्षे गेल्यानंतर वेदोपनिषदांतून त्याने काव्यात्मक शब्दां
त विज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. या जगात अनुभवसंपन्न होण्यासाठी त्याच्या कित्येक पिढया अशा खर्ची गेल्या असाव्यात. अर्थात त्यासाठी शेकडो वर्षाच्या कालावधीत त्याला बरेच चटके सोसावे लागले. मागच्या माहितीत सुधारणा करून त्याला अद्यावत करण्याचे काम त्याच्या पुढच्या पिढीेने केले. हे करीत असताना त्याचा सहोदर असलेल्या निसर्गातील सुत्रे त्याने शब्दांत मांडताना त्याच्या माहितीचा साठा शिल्लक राहावा म्हणूनी कधी शिल्पकला, हस्तकला, काव्य, प्रतिके यांचा आधार घेउन पुढच्या पिढीसाठी ज्ञान राखून ठेवले. त्यापैकी काव्य आणि परंपरेने चालत आलेली प्रतिके यांचे उदाहरण घेता येईल.
आता शिवलिंगाची पुजा करताना कुठलाही भाविक त्यामागचे विज्ञान समजून घ्यायलाच तयार नसतो. शिवलिंग हे सृष्टीतील एक सृजनाचे प्रतिक असल्याचे त्याला सांगीतले तर तो काहीसा नाक मुरडतो. लिंग आणि योनीच्या माध्यमातून या सृष्टीतील सृजनाची पुजा करण्याचा आमच्या पूर्वजांचा किती मोठा भाव होता. त्याबद्‌दल त्याने अतिशय आदरभाव बाळगला होता. त्याने दहीदूधाने त्याचा अभिषेक केला होता. त्यासाठी दहीदुध वापरणे हेही प्रतिकात्मक होते. संभोग हे सृजनशिलतेतील महत्वाचा टप्पा आहे, हे यातून सुचित करण्याचा प्रयत्न आमच्या पूर्वजांनी केला. सगळी सृष्टीच त्याभोवती फिरत आहे. सगळे सामाजिक, अध्यात्मिक, भौतिक व्यवहार, हे संभोगाच्या अवतीभवती सुरू आहेत. निसर्गानं केलेली ही योजना आमच्या पूर्वजांना कळली होती , तर असो.
दुसरे प्रतिक आहे लक्ष्मी आणि सरस्वतीचे. या नावाच्या देवता कधीही जन्माला आलेल्या नाहीत, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. प्रतिभेचा स्पर्श झालेला माणूस हा नेहमी साध्या वेशात राहातो. त्याला चमकदारपणा किंवा दिखाउपणा मुळीच पसंत नसतो. उलट श्रीमंत व्यक्‍तीला आकर्षक वस्त्रे परिधान करून राहणे आवडत असते. किंबहुना आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा उपद्‌व्याप तो करीत असतो. म्हणून त्याच्याकडे
सगळे आकर्षित होतात. हा गुण प्रत्येक युगात , प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळतो. लक्ष्मी , सरस्वती ही निव्वळ प्रतिके आहेत. अगदी ताजे उदाहरणच द्यायचे झाले तर भारतमातेचे देउ शकतो. भारतमाता नावाची देवी सिंहावर आरूढ होउन हातात झेंडा किंवा कमरेला तलवार लटकवून असल्यामुळे ती देवी कधीतरी जन्माला आली असल्याचा भाव अडाणी माणसांबरोबर शहाण्या लोकांच्याही मनात उत्पन्न होउ शकतो. मित्रहो, जगाच्या पाठीवर असा प्रकार कुठेही बघायला मिळत नाही. अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा चिन, जापानने असले काहीही केले नाही. आपण मात्र मनात देशभक्‍ती कायम राहावी, म्हणून पुन्हा 36 कोटी देवांदिकांमध्ये पुन्हा भर घालून एकेका देवतेची निर्मीती करीत राहतो. देवा-धर्माशिवाय आपल्याला चांगली भावना जोपासताच येत नाही, हेही तितकेच खरे. देव निर्माण केल्यामुळे आपण किती देवभोळे आहोत, याचा प्रत्यय जगाला पदोपदी आणून देतो.
अर्धनारीनटेश्‍वराची मूर्ती बघीतली तर आपले अध्यात्म हे दुसरे तिसरे काही नसून विज्ञानच असल्याचे प्रत्यंतर येते. "एक्‍स ..एक्‍स' हे गुणसुत्र केवळ महिलांत असते. एक्‍स वाय गुणसुत्रांची जोडी ही पुरूषात असते, हे आपल्याला शाळेत शिकविले जाते. हे ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी प्राचीन माणसाजवळ
कुठलेच साधन नव्हते. अर्धनारीनटेश्‍वराच्या प्रतिकांतून त्याने विज्ञानच सांगीतले आहे.
भाषेचा उत्कर्ष झाल्यानंतर गेल्या दहा वीस हजार वर्षात तो काव्य करायला शिकला. ज्ञान स्मृतीत राहावे म्हणून त्याने काव्याचा आधार घेतला. श्‍लोकाच्या माध्यमातून काव्याच्या रूपात मंत्र, सुत्रे, गुढ ज्ञान मांडण्याचा प्रयोग त्याने सुरू केला .. तो आजतागायत सुरू आहे. म्हणून ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवली किंवा ज्ञानदेवाने रेडयाच्या तोंडून वेद वदवून घेतले, असे आपण म्हणतो, तेव्हा त्यातील काव्य किंवा अर्थ समजून न घेता त्यांच्या केवळ शब्दार्थावर जाउन संत ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभासंपन्न महाकविंवर चमत्कारी असल्याचा आरोप करतो. तसेच अगदी अलीकडच्या काळातही आपण संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांजबद्‌दल अफवा उठवून त्यांचे दैविकरण करणे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईत जिंकण्यासाठी आई भवानीनेच तलवार दिली, तिचेच नाव भवानी तलवार असे साळसुदपणे सांगतो किंवा ऐकतो.

तुळसीचं रोपटं आपण दारात लावतो, ते कशासाठी तर त्यामागे ते प्राणवायुचा पुरवठा सतत चोविस तास करीत असते, हे त्यामागचं विज्ञान आहे म्हणूनच ना !
ही प्रतिके हजारो वर्ष चालत आल्यानंतर त्यामागचा विचार पुसला गेला. विज्ञान हरपलं. प्रतिकांची भाषा विसरून आपण एक अंधश्रद्‌धा म्हणून तिचा स्वीकार केला. आताही प्रतिकांची पुजा करताना त्याचा विचार होताना दिसत नाही. प्रतिकांमधील विज्ञान आणि मोठा ज्ञानाचा साठा कालांतराने मृतप्राय झाल्याचं जुन्या प्रतिकांमधून दिसतं.
अलीकडच्या काळात माणसांपेक्षा प्रतिकेच मोठी झालेली आहेत. आधुनिक विज्ञानाने हा धोका ओळखून सुत्रांची भाषा अवगत केली. "एचटुओ' हे सुत्र मांडले की त्यात स्पष्टीकरण देण्याची गरज उरत नाही. "एचटू ओ' म्हटले की पाणीच. त्याखेरिज दुसरा अर्थ काढताच येणार नाही. महान रूषीमुंनींनी काव्यात मांडलेलं ज्ञान सर्वसामान्य माणसाच्या डोक्‍यावर अंधश्रद्‌धा म्हणून नाचू लागताच विज्ञानानं स्वीकारलेली पद्‌धत माणसाला डोळस करणारी आहे. त्यामुळे भविष्यात भौतिकशास्त्रासारखी विज्ञानशास्त्रे सुत्रांच्या भाषेत ज्ञान मांडण्यास प्राधान्य देतील, हे निर्विवाद सत्य आहे.

                                                              * विजयकुमार राऊत


सोमवार, 3 अगस्त 2015

जगणे सुंदर व्हावे म्हणून !

                                     


                                                           विजयकुमार राऊत

नकारात्मकता एक गंभीर आजार आहे...आणि त्यापासून आपण शेकडो मैल दूर राहिलेलचं बरं...जे सिद्‌ध करायचे आहे, ते या सृष्टीच्या बाहेरचे नसल्यामुळे आपण कधीही, केव्हाही आणिा काहीही सिद्‌ध करू शकतो. अगदी पुराव्यांचा आधारावर गुन्हा नसतानाही फासावर लटकविण्याचीही सोय करता येते. त्यासाठी रिसर्च सेंटरच्या किंवा "नासा'च्या दाखल्यांची मुळीच गरज नसते. आपण सकारात्मक राहिलो तर आपल्यालाच त्याचा फायदा नक्‍की होईल आणि दुस-यांनासुद्‌धा सुखी करण्याचं सामर्थ्य आपल्यात येईल. त्यासाठी मनाची उत्तम तयारी मात्र करणे आवश्‍यक असते... आणि तेच कठीण आहे. एखादा आळसी विद्यार्थी अभ्यास न करता नापास होण्यासाठी कठीण आलेला पेपरच कारणीभूत होता, असं म्हणत जवाबदारी झटकण्यातच धन्यता मानतो.
अध्यात्म खोटं वगैरे सांगून मनातील नकारात्मक विचाराकडे होत असलेली वाटचाल वेळीच आपण आपल्या ध्यानात घेतलेली बरी. कारण कुठलेच शास्त्र खोटे नसते. पोटार्थी लोक त्याचा बाजार करून त्याला बदनाम करतात. माझे जगणे मला सुंदर करायचे आहे, म्हणजे मला माझ्‌यावरच लाख लाख उपकार करायचे आहेत, असे समजल्यास काय हरकत आहे? माझया ठिकाणी इतरांसारखा क्रोध हा विकार असेल, निंदा करण्यात मला आनंद वाटत असेल किंवा दुस-याला दुःख देण्यात जर मला असुरी समाधान मिळत असेल तर.. क्षुद्र विचार केल्यानंतर माझया वागणुकीतून दुनियेचा रोष पत्करणार असेल आणि माझे या रस्त्याने चालल्यास नुकसानच अधिक आहे. असे केल्याने माझे आरोग्य संपुष्टात येत असेल तर उत्तम विचारणे ठेवणे हा गुन्हा नाही. "मेडिटेशन' करणे हे दुबळया मनाचे लक्षण नव्हे तर एका स्वस्थ आणि निरोगी मनाचे सामर्थ्य होय.
चला मान्य आहे. तुमच्या दृष्टीकोनातून एक बाजू आजारी आणि लंगडी आहे; तर दुसरीही मानसिक आजाराचे लक्षण आहेच की नाही? एक वाट मानसिक विकासाकडे आणि दुसरी मानसिक अधःपतनाकडे जाते, हेही जेवढे लवकर लक्षात घेतले तर उर्वरित आयुष्यात आपोआपच बदल होतो. मित्रा, सकारात्मकता घेउन जगलो तर नुकसान काय आहे? उलट फायदाच आहे. प्रश्‍न देव मानण्याचा किंवा न मानण्याचा नाही. कारण देव मानणारेच बहुतांश अतिरेकी असतात, हे मला मान्य आहे. माणूस हा आस्तिकही असत नाही आणि नास्तीकही नसतो. फक्‍त तो वास्तविक असतो, म्हणून त्याच्या जगण्याकडे वास्तविक दृष्टीने पाहणेच योग्य आहे. आपण स्वतःत सुधार घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले पाउल कधीच वाईट नसते. परमेश्‍वर भक्‍ती वगैरे वगैरे तर निव्वळ औपचारिकता आहे आणि तशी एका अर्थाने विशिष्ट पातळीपर्यंत तिची गरज आहे. पुढच्या प्रवासात त्याची काही गरजही उरत नाही.

"आता विश्‍वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ' म्हणत "जो जे वांछिल ते तो लाहो' अशी प्रार्थना करीत सर्व मांगल्याचा विचार करणे म्हणजे कोणत्या देवाला मानणे होय? देव मानल्यास किंवा न मानल्यास देवाचे किंवा कुणाचे फार काही नुकसान होत नाही. खरा "परमेश्‍वर', "गॉड, "अल्लाह' जो असतो त्याला नाव देता येणार नाही, तो आहे फक्‍त आनंदस्वरूप. व्यवहारात निखळ आनंदाऐवजी हिशेबच लावणारे जास्त भेटतात. कुठलीही गोष्ट चुकीच्या मापात मोजने आणि तिची तुलना करून तिचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व ठरविणे म्हणजे स्वतःलाच मर्यादा घालण्यासारखे आहे. माझ्या स्थितीला नशिब किंवा दुसरा कोणी जवाबदार आहे, असे म्हणत कुढत जगणारे जगात कमी नाहीतच. स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याचा प्रयत्न करणे, हेच ख-या अध्यात्माचे सार्थक आहे. जगभरातील कुठल्याही धर्माचा अभ्यास केला तर हेच सांगीतलेलं आहे. थोडे डोळे उघडे ठेवून बघावे लागेल एवढेच!

मनाचा रस्त्याला भलतीकडे जाण्यापासून रोकले तर जीवन नव्याने कळायला लागेल. विरोधाभास जगात नाहीच, दिसतो तो फक्‍त चांगला, वाईट भास. माझ्याविरोधात बोलणारे किंवा वागणारे माझे हितचिंतक आहेत, हे ही तितकेच खरे आहे, हेही स्वीकारले तर कुणाशीच शत्रुत्व उरत नाही. माझे शत्रू नकळत माझ्या विकासाला हातभारच लावित आहे. थोडा मनाने बदल स्वीकारला तर? द्वंद निर्माण करून वाद घालणे माणसाचा स्वभाव आहे. वाद-विवाद ओढून घेण्यासाठी काही बोलणे गरजेचे नाही. मी चकार शब्द न बोलताही वाद घालण्यासाठी कोणीही माझ्यावर टिका करू शकतो. कारण त्याचं मन त्याच्याशी द्वंद करीत असतं. त्याला तसे स्वातंत्रय आहे. प्रश्‍न माझा नाही तो त्याचा स्वतःचा आहे. वाद घालण्याचा विचार त्याचा स्वतःचा असल्यामुळे त्याला मी काय करणार? अशावेळी शब्दाने शब्द वाढविण्यापेक्षा मौन राहूनच स्थितीचे निरपेक्ष भावाने चिंतन केले तर आपणच आपल्याला ख-या अर्थाने दिसायला लागतो.. नव्या अर्थाने कळायला लागतो. तेव्हाच जीवन अधिकाधिक सुंदर होत जाते !

                                                            विजयकुमार राऊत


                                                            विजयकुमार राउत

शनिवार, 1 अगस्त 2015

सत्यम शिवम सुंदरम


                                                                                       विजयकुमार राउत

हमारे बुर्जूग कहा करते थे "सत्यम शिवम सुंदरम' जानेमाने फिल्म निर्देशक कपूर की इसी नाम की फिल्मभी आयी थी. उसमे एक गीतभी था. "सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है..' सत्य बहोत ही सुंदर और पवित्र होता है...सत्य बहोतही सरल और साधा होता है. इसलीये तो उसे शिव यानी परमात्मा कहा जाता है. लेकिन हमको व्यावहारीक जीवन मे असत्य स्वीकारना बडाही सरल लगता है. क्‍योकी हमारे सामने जो चिज चमचमाती है , उसीकी ओर हमारे कदम बढने लगते है . असत्य तो हमे बडा प्रभावित करता है. हमारा उसी के प्रति आकर्षण हो जाता है. जो हमारे फायदे का होता है उसेही हम सत्य कहते हेै. जो नुकसानदायक होता है वो हमारे लिये असत्य हो जाता है. सत्यपर सिर्फ हमारीही मालकी होती है ऐसा हम समजते है.धीरे धीरे जिंदगी मे एैसीही हमारी सोच बन जाती है.लेकीन वास्तविकता जाने तो सत्य फायदा और नुकसान के पार होता है. सत्य किसकी पैरवी नही करता बल्की सत्य सत्य होता है. यह तथ्य जिस दिन हम अपना लेते है तब हमारे जिवन मे परिवर्तन शुरू होना शुरू हो जाता है.

खलील जिब्रान की एक कहाणी है. एक बार सत्य और असत्य की दो देविया स्वर्गसे उतरकर जमींपर आ गई. स्वर्ग से लेकर पृथ्वी तक का उनका सफर था. उनके कपडे बहोतही मैले हो चुके थे. धुल चढ गई थी कपडो पर . तो उन्होने एक नदी मे जाकर स्नान करने की इच्छा जतायी . औरे वे दोनो नदी के पास गई. दोनोने अपने बदन से कपडे उतारे, किनारे पर रखे और नदी मे कुंद पडी. तैरते तैरते सत्य की देवी बडी दूर तक चली गई थी. और असत्य की देवी बहुत पिछे रह गई. उस समय असत्य की देवीके मन मे विचार आया. वापस पलटकर सत्य के देवी के कपडे उसने पहन लिये और भाग गयी. सत्य की देवी स्नान करने के बाद किनारे पर आई . उसके कपडे किनारे से गायब हो चुके थे. सुबह हो चुकी थी. नदी किनारे लोगोकी चहल पहल अब बढनेवाली थी. उसने तुरंत असत्य के देवी के कपडे पहनकर अपनी लज्जा ढांकणे की कोशिश की और वहा से भाग गयी. तबसे लेंकर अभी तक हालत वैसेही कायम है. सत्य अपने वही फटे पुराने कपडे पहने है. और असत्य की देवी आकर्षक खुबसुरत लिबास मे दुनियामे इतराते हुवे घुम रही है. जिब्रान की यह कहानी काफी मशहूर है. जिब्रानने हकीकत बयाण की है इस कहानीमे. सत्य बहोत साधे लिबास मे घुम रहा है. हमारी संस्कृतीमे अक्‍सर ऐसा हमको देखने को मिलता है. धन की देवी लक्ष्मी और विद्या की देवी सरस्वती. चित्र मे दोनो एक साथ होती है. सरस्वती जो की कला व विद्या की देवता है. वे साधे, सफेद कपडे पहनकर हाथो मे विणा लेकर प्रसन्न भाव दर्शाते हुवे बैठी है. और धन की देवी आभुषणोसे मढी हुवी आशीर्वाद देने के लिये हाथो से सोने-चांदीकी बरसात करते दिखाई देती है. हमारे समाज की निव को हम देखते है तो साफ जाहिर होता की किसी गुणवान व्यक्‍ती को पैसो के अभाव के कारण पिछे रह जाता है. हालाकी गुणवान और चारित्रयवान व्यक्‍ती हमेशा अपने कर्म को साधना और तपस्या समझकर जिता है. वो लोगो के नजर मे बिचारा गरीब कहलाता है. हालाकी वह दिलसे बहुत अमीर होता है. उसे पैसो के सामने अपमानीत होना पडता है. दुनिया चमकनेवाले जुगनू को बहुतही पसंद करती है. लेकीन वे जानते नही की चमकनेवाला जुगनू ज्यादा देर तक चमककर रोशनी नही दे पाता है.

वैसे देखा जाये तो असत्य पहचानने मे और सत्य की परख करने मे हमारी आँखे हमेशा धोखा खा लेती है. जो हमारा ध्यान अपनी ओर आकर्षित कर लेता है वो कभीभी सत्य नही हो सकता. थोडा गौरसे देखेंगे तो असली बात समझ मे आ जाती है. चिनमे एक रूषी थे. उनकी सत्यके बारे मे बहुतही ख्याती थी. वो सत्य के सामने कभीभी समझोता नही करते थे. राणीने कई बार उसकी परीक्षा लेने के लिये उसे महल आने की खबर भेजी. लेकीन उस तपस्वीने राणी की आज्ञा को ठुकरा दिया. क्‍योकी कोई सत्य के शिवाय किसी और की सत्ता वे मानते नही थे. इसलिये वे राणीसे मिलने के लिये उत्सुक नही थे. राणी को गुस्सा आ जाता है. और वो उनकी परीक्षा लेने उनके आश्रम मे चली जाती है. तपस्वी से कहती है के तुम अगर सच्चे तपस्वी हो तो मेरे हाथ मे दो फुल है. उनमेसे असली कौनसा है और नकली कौनसा उसे पहचानो. तपस्वी समाधी मे लिन थे. आश्रम के दरवाजे बंद थे. उन्होने आँखे खोलते हुवै क्षणभर उस राणी को देखा और कहा, तुम्हारे दाये हाथ मे जो फुल है वो असली है और बाये हाथ का फुल नकली है. राणी अचंभित रह गयी. क्‍योकी साधू महाशय ने आँसे बंद करके यह निर्णय लिया था. राणी प्रभावित होकर साधू के चरणो मे गिर पडी. और उसने तपस्वी को पुँछा...हे तपस्वी आपके जवाबसे मै अचंभित रह गई. आँखे बंद होने के बादभी आपने यह अनुमान कैसे लगाया की मेरे दाये हाथ का फुल असली और बाये हाथ का फुल नकली है?साधू महाशय मंद मंद मुस्काये और उन्होने कहा , हे राणी आपने आश्रम मे जैसेही प्रवेश किया और असली फुल की महक मेरे नाक तक आ गई. फिर मैने आँखे बंद करने के पहले देखा की मख्खी आपके दाये हाथ मे जो फुल था उसपर बैठी है .. और मेै उस फुल की असलीयत पहचान गया. तुम्हारे दुसरे हाथ मे जो फुल था वह केवल कागज का फुल था, नकली था, यह बात मै जान गया. असली फुल नकली फुलसे जादा आकर्षक था. लेकीन उसपर कोई मख्खी बैठे भी कैसे?

जो लोग सत्य की झलक पा लेते है.. उनकी जिंदगी कुछ और हो जाती है..सुकरात जिसने सत्य की खोज की. सत्य पाने के लिये उसने जहरतक पि लिया. क्‍योकी वह जानता था की सत्य के सामने अपनी जान गई तो उसमे क्‍या बडा हुवा? गॅलीलिओ को भी सत्य का ज्ञान हुवा था. इसलीये उसने कैद पसंद की... और मर गया.

सत्य की यात्रा बडी लंबी और आनंददायी होती है. क्षणैक सुख के लिये हम झुठ का सहारा लेते है. ऐसा जरूरी नही की सत्य हमेशा हारही खा लेता है. लेकीन सत्य को निहारणे मे थोडा समय जादा लगता है. क्‍योकी उसकी यात्रा का कही हिसाब नही. असत्य की उम्र बडी छोटी होती है.

                                                                     विजयकुमार राउत

 
Blogger Templates