Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

माणसाचा शोध


                                                                          विजयकुमार राउत
"माणूस द्या मज माणूस द्या'! हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ब्रिद... ग्रीसमधील डायग्नोसिस हा मोठा तत्ववेत्ता. अंगावर एक कापडही न घालता चोविस तास डोक्‍याजवळ कंदील घेउन झोपत असे. दिवसा त्याच्याजवळ कंदील पेटलेला पाहून अनेकांनी त्याला वेडयात काढलं होतं. कुणी विचारल तर तो सांगायचा की कधीपासून मी माणसाचा शोधच घेत आहे. परंतु मला अद्याप माणूसच मिळाला नाही. माणसाला शोधण्यास दिवसाचा उजेड कमी पडू नये म्हणून तो कदाचित कंदील बाळगत असावा.
झांजस हा इसापचा मालक. गुलामांच्या बाजारातून त्याने इसापला खरेदी केलं होतं. अतिशय कृशाग्र बुद्‌धीच्या इसापच्या प्रतिभेची झलक अनेक कथांमधून दिसून येते. एकदा झांजसला विहिरीवर उघडयावर स्नान करण्याची हुबक येते. त्यांने इसापला विहिरीवर माणसे किती आहे हे, पाहून यायला सांगीतलं. इसाप जेव्हा विहिरीवर गेला तेव्हा त्याला विहीरीवर अंघोळ करणा-यांची खूप गर्दी दिसली. तो दूर जाउन एके ठिकाणी उभा राहिला. अंघोळीला येत असलेला प्रत्येक जण रस्त्यात असलेल्या दगडाला ठेच लागून जात होता. विहिरीवर झालेली गर्दी पाहून तहानेने व्याकुळ झालेला एक भिकारी कितीतरी क्षणांपासून उभा होता. इतक्‍यात एक व्यक्‍ती घाईघाईने विहिरीवर अंघोळ करायला आली. त्याला दगडाची ठेच लागताच त्याने मार्गातील दगड हाताने उपटून दुरवर फेकून दिला. मग त्या भिका-याकडे वळला. बादलीने विहिरीतील पाणी काढून त्याने तहानलेल्या भिका-याला पाजले. इसाप घरी गेला. विहिरीवर गर्दी आहे का? किती माणसं आहेत? झांजसचा प्रश्‍न. लगेच इसापने उत्तर दिले की विहिरीवर केवळ एकच माणूस आहे. झांजस खूश झाला. अंघोळ करायला अडचणी नाह म्हणून तो लगबगीने विहिरीकडे निघाला. पाहातो तो काय विहिरीवर गर्दीच गर्दी होती. इसाप खोटा बोलला असं समजून झांजस फार चिडला. इसापला त्याने बेदम झोडून काढले. मारणे झाल्यावर त्याने इसापला विचारले. तू खोटं का बोललास? इसाप म्हणाला आपण मला किती माणसं आहेत, हे पाहून यायला सांगीतलं होतं. परंतु मला त्या गर्दीत केवळ एकच माणूस दिसला. त्याने त्याच्याठिकाणी माणूसकी होती म्हणून मार्गातला दगड उपटून फेकला. इतर सारे स्नान करण्यात मग्न होते. त्यांना तहानेने व्याकुळ झालेला भिकारी दिसला नाही की रस्त्यातला दगड दिसला नाही. परंतु या माणसाने त्या भिका-याला विहिरीचे यथेच्छ पाणी पाजले. त्याची तहान भागविली. असं म्हणतातच झांजसला खूप दुःख झाले. माणूस म्हणून जन्माला आलो तरी माणूस म्हणून जगणेच बहुतेकांना जमत नाही. या छोटया छोटया कहाण्यांतून माणसाचा शोध सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते.


 
Blogger Templates