* विजयकुमार राऊत
आपलं व्यक्तीमत्व म्हणजे केवळ एक हिमनगाचा
तुकडा. आयुष्यभर अव्यक्त राहिलेला भाग कितीतरी पटीने अधिक. आपणच आपल्यापासून दूर..
अंधाराखाली म्हणा नाहीतर अव्यक्त म्हणा. या अव्यक्त जाणिवेला आपला कधीही स्पर्श
झालेला नसतो. या सृष्टीचे गणित म्हणजे जे दिसते त्यापेक्षा अदृष्य पातळीवर घडणारे
असंख्य परिणाम आपल्यासाठी अपरिचित. हें जग भ्रम आहे ..कल्पना आहे.. असे भारतीय
तत्वज्ञानात सांगीतलेले आहे.
आपले दोन डोळे या जगाचा वेध घेण्यासाठी मात्र
नेहमी प्रयत्न करतात. पण अदृष्य जग हाती यायला मोठे परिश्रम पडतात हेच खरे. आता या
प्रकाशाचेच उदाहरण घ्याना. प्रकाश तरी आपल्या दृष्टीत किती असतो बरं?. आपली गरज
चिमूटभर प्रकाशाची असते. तो प्रकाश डोळयांच्या सिमा ओलांडून कधीच परावर्तीत होउन
परत आलेला नसतो. मग आपण जे डोळयांनी पाहिलं आहे त्याचेच दावेप्रतिदावे करीत बसतो.
वाद विवाद होतात. भांडणं होतात. मलाच सत्य गवसलं असा अट्टाहास होतो. या जगात
बुद्द आले , येशू आले, भगवान श्रीकृष्ण .. सगळे सगळे महापुरूष आले .. पण त्यांनी
या जगातलं अज्ञान दूर करण्याचा आपापल्या परिने प्रयत्न केला. परंतु कुठे झाला समाज
विवेकी? कुठे गवसल्या प्रकाशाच्या वाटा? ज्ञान मिळाल्याचा पुरस्कार करताना
एकमेकांच्या खोटयाला खरे माणनारे येथे एकमेकांना दाद देताना सत्याचा अपमान करीत
असल्याचं कसं ध्यानात येत नाही, माणसाच्या.? बुद्धांनी सम्यक ज्ञान आणलं.
मनुष्यजातीनं जिवनात अजिबात उतरविलं नाही. ओन्ली दू थिंग इज इन्फीनाईट. फस्ट्र
युनीवर्स अँड सेकंड हयुमॅन स्टुपीडीटी' असं आईनस्टाईन म्हणाला होता.बरोबर आहे ते.
कारण अर्जुनाचा युद्धभूमीवर थरकाप उडाला असताना भगवान श्रीकृष्णांनी त्याचा धर्म
सांगण्यासाठी आपलं साक्षात रूप दाखविलं. तेव्हा भगवंताच्या आकर्षक रूपानं अर्जुनाचे
मन प्रसन्न झाले. ते रूप वारंवार पाहण्याचा तो अट्टाहास करू लागला. परंतु
भगवंतांनी त्याला भानावर आणलं. "जे तुला आवडलं केवळ ते रूप माझं खरं रूप नव्हे, असे
म्हणून भगवंतांनी आपलं विदारक रूप त्याच्यापुढे आणंलं तेव्हा तो मुच्छीत होउन पडला.
भगवान श्रीकृष्ण आधीच पूर्ण अवतार.साक्षात पुर्णत्व. यानिमित्ताने भगवंतांनी
दिलेले ज्ञान समजून घेतलं तर आपल्याला जे आवडते आपण त्यालाच धरून ठेवण्याचा प्रयत्न
करतो हे आपल्या लक्षात येते. परंतु ज्या गोष्टी अप्रिय आहेत, त्या गोष्टींशीही
जमवून घेणं यालाच भगवंत पूर्ण सत्य म्हणतात. महान वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणतो ते
सत्य आहे. कारण आपण प्रकाशालाच परमेश्वराचं रूपं मानून त्याची पुजा करण्याची आपली
परंपरा आहे. संपूर्ण जगाला जीवन देणा-या सुर्याच्या मागचे जग जेव्हा नेहमी अंधारात
राहते. त्याच्या प्रकाशात न येणारे कितीतरी विश्व त्याच्या प्रकाशावाचून अनंत
वर्षे टिकून आहेच ना? ते जग एकाच वेळी पूर्ण झाकण्याचं सामर्थ्यही त्या सूर्यात
नसते. या ब्रम्हांडात अनंत कोटी सूर्य आहेत. तरीही विश्वातले "कृष्णविवर'
त्यापेक्षा अनंत पटीनं मोठे आहे. भौतिकशास्त्रातील कुठलेच नियम तेथे लागू पडत नाही.
विज्ञानात प्रचलित झालेल्या सगळया व्याख्या, गणिते... सगळे सगळे फेल ठरतात. आपल्या
अवचेतन मनाच्या शक्तीचेही तसेच आहे. ज्या मनाची या लौकिक जगात सदानकदा सोबत असते
ते चेतन मन. केवळ 20 टक्के एवढंच. उर्वरित 80 टक्के शक्तीचं भांडार मात्र अवचेतन
मनात साठलेलं असतें. या अवचेतन मनाच्या शक्तीचा अनुभव घेतल्याशिवाय जगातील
बहुसंख्य जिव जगाचा निरोप घेतात. विज्ञानाच्या भाषेतही हेच लागू पडतं. डावा मेंदू
क्रियाशिल असल्यामुळे उजव्या मेंदूकडे दुर्लक्ष करून त्याच्या अगणित सामर्थ्याचा
अनुभव घेण्याइतके आपण प्रगल्भ नसतो. * विजयकुमार राऊत |
|
|