विजयकुमार राऊत
"पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, जो
खेलोगे कुदोगे तो होंगे खराब' हे गाण लहानपणी रेडीओवर नेहमी ऐकायला मिळायचं. काळ
बदलला. चित्र बदललं. आता "शिक्षणाच्या आवशीचा घो' अशा शिव्या हासडण्यापर्यंत नव्या
पिढीची मजल गेली. आवडत्या खेळात रमून सचिन तेंदूलकरसारखा क्रिेकेटपटू तयार झाला.
औपचारिक शिक्षण घेउन चिरंजिवांनी काय दिवे लावलेत, असा प्रश्न पालक करू लागले.
किंवा उच्च शिक्षण घेतले नाही म्हणून सचिन तेंदूलकरचं काय बिघडलं? असंही म्हणणारे
भेटतील. मुळात शिक्षण घेणे आणि नोकरी मिळविणे हे समीकरणच झालं. शहाणा, सुसंस्कृत
होण्याचा शिक्षणाचा संबंधच कुठे उरला? शिक्षण हे नोकरी मिळवून एैशोआरामात जीवन
जगण्यासाठीच असतं, असे म्हटले तर काय चुकलं?
आज सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती झपाटयाने खेडयापाडयापर्यंत पोहचली. जि.प.शाळा "झोलबा पाटलाचा वाडा' वाटण्याइतपत आपली पत गमावून बसल्या. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा ताडताड इंग्रजी बोलावा असं वाटू लागलं. त्याला चांगल्या कॉन्व्हेंमध्ये शिकविण्यासाठी तो मागेल ती रक्कम मोजू लागला. जमाण्याच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर स्पर्धा आवश्यक, हे सुत्र प्रत्येकाच्या अंगात चांगलं भिनलं आहे. आपल्या मुलानं शिक्षण फक्त नोकरीसाठी घ्यावं, अशी मानसिकता तयार झाली. शासनही शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यातच धन्यता मानू लागलं. "आरटीई' अंतर्गत मुलाला प्रवेश मिळावा म्हणून वडिल मोठया शाळेचे स्वप्न पाहू लागले. शेवटी पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळाला की पूर्वजांचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद पालकांना वाटायला लागला. आम्ही इतर शाळांच्या तुलनेत कसे उत्तम शिक्षण देतो, याबद्दलची बढाई मारण्यात शाळेच्या संचालकांपासून मुख्याध्यापकांपर्यंत कुठेच कमतरता बाळगली जात नाही. आता शिक्षणाच्या नावाने इतका सुकाळ असताना, माशी कुठे शिंकते कोण जाणे? समजा एखादया नामांकित शाळेत मुलाला प्रवेश मिळाला तर समाजातील गरीब पालक आधीच या शाळेत असलेल्या धनाठय पालकांच्या मुलांशी कुठल्याबाबतीत स्पर्धा करणार आहेत का? शिक्षणाची की आर्थिक संपन्नतेची? मुलांच्या निष्पाप मनावर कुठेल संस्कार घडवतो. विद्यार्थ्यांना "मठ्ठ' निर्बुद्ध म्हणून शिवी देणे कायदयाने गुन्हा ठरविले जाते. मग अशा वातावरणात आपण श्रीमंत मुलांच्या तुलनेत गरीब आहोत, हेच संस्कार त्यांच्या मनावर बिेंबविणार आहोत का?
त्याच्या मानसिक जडघडणीच्या काळात त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचे काम कोण करतंय?अशा एक ना अनेक प्रसंग बालमनावर आघात करून जातात. जसे आम्ही तशीच आमची शिक्षणपद्धती आहे. तिच्यात तसुभरही कमी नाही. हुशार मुलांना पहिल्या बाकावर आणि आकलनात मागे पडलेल्या विद्यार्थ्याला मागच्या बाकावरील स्थान देण्यात येंतं. अमीर खान यांचा "तारे जमिनपर' या विषयावर नेमका प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांतील वेगळी वैशिष्टये ओळखून त्याच्या उपचार करणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम करतो. परंतु शिक्षकही आपले काम सोपें कसे होईल,या विचारात परंपरेने चालत आलेल्या आयुधांचा वापर करून हुशार विद्यार्थ्यांनाच पॉलीश करण्याचं काम करतात तेव्हा एकंदर शिक्षण पद्धतीची कीव करावीसी वाटते. पुस्तकातील किडे होउन जगण्यापेक्षा निसर्गातील ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतलेलया अनुभवांना पुस्तकाची जोड दिली तर विद्यार्थीही आपलं जिवन घडवितील. रविंद्रनाथ टागोरांसारखं प्रयोगशिल होउन "शांतीनिकेतन' घडविण्याचं सामर्थ निर्माण करता येईल.
आज सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती झपाटयाने खेडयापाडयापर्यंत पोहचली. जि.प.शाळा "झोलबा पाटलाचा वाडा' वाटण्याइतपत आपली पत गमावून बसल्या. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा ताडताड इंग्रजी बोलावा असं वाटू लागलं. त्याला चांगल्या कॉन्व्हेंमध्ये शिकविण्यासाठी तो मागेल ती रक्कम मोजू लागला. जमाण्याच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर स्पर्धा आवश्यक, हे सुत्र प्रत्येकाच्या अंगात चांगलं भिनलं आहे. आपल्या मुलानं शिक्षण फक्त नोकरीसाठी घ्यावं, अशी मानसिकता तयार झाली. शासनही शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यातच धन्यता मानू लागलं. "आरटीई' अंतर्गत मुलाला प्रवेश मिळावा म्हणून वडिल मोठया शाळेचे स्वप्न पाहू लागले. शेवटी पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळाला की पूर्वजांचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद पालकांना वाटायला लागला. आम्ही इतर शाळांच्या तुलनेत कसे उत्तम शिक्षण देतो, याबद्दलची बढाई मारण्यात शाळेच्या संचालकांपासून मुख्याध्यापकांपर्यंत कुठेच कमतरता बाळगली जात नाही. आता शिक्षणाच्या नावाने इतका सुकाळ असताना, माशी कुठे शिंकते कोण जाणे? समजा एखादया नामांकित शाळेत मुलाला प्रवेश मिळाला तर समाजातील गरीब पालक आधीच या शाळेत असलेल्या धनाठय पालकांच्या मुलांशी कुठल्याबाबतीत स्पर्धा करणार आहेत का? शिक्षणाची की आर्थिक संपन्नतेची? मुलांच्या निष्पाप मनावर कुठेल संस्कार घडवतो. विद्यार्थ्यांना "मठ्ठ' निर्बुद्ध म्हणून शिवी देणे कायदयाने गुन्हा ठरविले जाते. मग अशा वातावरणात आपण श्रीमंत मुलांच्या तुलनेत गरीब आहोत, हेच संस्कार त्यांच्या मनावर बिेंबविणार आहोत का?
त्याच्या मानसिक जडघडणीच्या काळात त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचे काम कोण करतंय?अशा एक ना अनेक प्रसंग बालमनावर आघात करून जातात. जसे आम्ही तशीच आमची शिक्षणपद्धती आहे. तिच्यात तसुभरही कमी नाही. हुशार मुलांना पहिल्या बाकावर आणि आकलनात मागे पडलेल्या विद्यार्थ्याला मागच्या बाकावरील स्थान देण्यात येंतं. अमीर खान यांचा "तारे जमिनपर' या विषयावर नेमका प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांतील वेगळी वैशिष्टये ओळखून त्याच्या उपचार करणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम करतो. परंतु शिक्षकही आपले काम सोपें कसे होईल,या विचारात परंपरेने चालत आलेल्या आयुधांचा वापर करून हुशार विद्यार्थ्यांनाच पॉलीश करण्याचं काम करतात तेव्हा एकंदर शिक्षण पद्धतीची कीव करावीसी वाटते. पुस्तकातील किडे होउन जगण्यापेक्षा निसर्गातील ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतलेलया अनुभवांना पुस्तकाची जोड दिली तर विद्यार्थीही आपलं जिवन घडवितील. रविंद्रनाथ टागोरांसारखं प्रयोगशिल होउन "शांतीनिकेतन' घडविण्याचं सामर्थ निर्माण करता येईल.