जग हे अनिश्चितीतेचे
uncertentity principal
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते' अशी आपल्याकडे म्हण आहे. दैनंदिन जीवनात त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. निश्चित हे जग कसे आहे, कशाने बनले आहे, यामागचे सत्य स्वरूप कसे असावे, हा प्रश्न शेवटी माणसाला पडतोच. त्याचा शोध आजपर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आताही तेच करीत आहेत. उद्याही त्यांचा प्रवास असाच सुरू राहिल. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी वर्षानुवर्षे जगाच्या मागचे रहस्य उलगडण्याचा आपापल्या त-हेने प्रयत्न केला आणि करताहेत. जग हे नेमके कसे असते, याचा उलगडा कुणालाच होउ शकला नाही, असेही म्हणता येणार नाही. दुर्दैवाने म्हणावे तर त्यामागचे रहस्य आपल्यालाच पूर्णपणे कळू शकले नसावे, कदाचित ! यामागचे कारण असे की ज्या महापुरूषांना जग जसे दिसले, तसे सांगण्याच्या त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या भाषेपर्यंत किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवांपर्यंत पोहचण्यात आपणच कमी ठरत असावे, हे सुद्धा त्यामागचे कारण असू शकते. आजच्या विज्ञानातील "कॉम्प्यूटर सिम्यूलाईजेशन हायपरथेसिस' या सिद्धांताप्रमाणे महापुरूषांच्या अनुभवातील "ब्रम्ह सत्य, जगं मिथ्या' हा उपदेश पुरेसा असू शकतो. किंवा होलोग्राफिक प्रिंसीपलप्रमाणे प्रोजेक्टरमधील प्रकाशाच्या एका बिंदूतून पुढे जगाच्या अफाट विस्तारापर्यंत विकास पावलेल्या स्थितीपर्यंतही जगाचा प्रवास असू शकतो. आनंदने केलेल्या प्रश्नावर बुद्धाने दिलेल्या उत्तरातून जग क्षणोक्षणी प्रसरण पावत आहे, असा उपदेश करण्यामागे बुद्धांचे विज्ञानच नाही का?
हजारो वर्षांपासून भारतीय अध्यात्मशास्त्रातील "पिंडी ते ब्रम्हांडी' या सुत्रातूनही नेमके हेच अधोरेखित होते. म्हणून कुठेच उणेपणा न येता बुद्धपुरूषांची वचने आजही सर्वश्रेष्ठच ठरतात. ज्या महापुरूषांना हे कळले ते यातील "माईलस्टोन' म्हणून जगापुढे सिद्ध झाले. परंतु कुठल्याच संकल्पना पूर्णपणे समजून न घेता आपण निव्वळ विरोधाच्या पातळीवरच जाउन आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यास कारणीभूत असतो. प्रत्येक धर्माने जगाचे स्वरूप कसे असते हे सांगण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपण मात्र त्याचा मर्थितार्थ समजून घेण्याऐवजी धर्माच्या बाहयरूपातच मग्न झालो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञानातील भांडण वर्षानुवर्षे हे असेच सुरू राहणार आहे. खरे म्हणजे स्वतःला पदोपदी बदलविण्यात विज्ञान दिवसेंदिवस विनम्र मानत असते. दिसणा-या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडा, असा संदेश अध्यात्म देते. त्यावेळी आपण कधीच "सिरियस' नसतो. एकंदर कसे की आपण धड अध्यात्मीक किंवा विज्ञानविषयी जाणून घेण्यास दोन्ही पातळीवर अंधश्रद्धच असतो. मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. पण सदासर्वकाळ काही मूठभर लोकांसाठीच धर्म ही अफूची गोळी राहू शकतो. सगळयांसाठीच नाही. अनेकांसाठी तो सन्नमार्गावर चालण्यासाठी प्रेरक ठरत असतो. धर्म हा माणसाला नितीतत्वाशी जोडतो व एका उदात्त अशा ध्येयाकडे घेउन जातो. सरतेशेवटी आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञही म्हणून गेला की विज्ञानाशिवाय कुठलाही धर्म (कॉस्मीक रिलीजन) नसावा आणि धर्माशिवाय विज्ञान नसावे. कट्टरता ती धार्मिक असो वा पुरोगामी यातील कुठलीच गोष्ट योग्य नाही. म्हणून जे प्रत्यक्ष डोळयांनी दिसते आहे, ते तसेच असावे का, याबद्दल शंका घेणे ही आज खरी वैज्ञानिक बाब म्हणून पुढे येत आहे. यासाठी अनेकानेक सिद्धांत मांडण्यात आले. हे सर्व सिद्धांत समजून घ्यावे लागतील. उलट त्यांना टाळतो म्हटले तर सत्यापासून दूर जाण्यासारखे किंवा अंधारात जगण्यासारखी चूक कुठलीच ठरणार नाही.
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते' अशी आपल्याकडे म्हण आहे. दैनंदिन जीवनात त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. निश्चित हे जग कसे आहे, कशाने बनले आहे, यामागचे सत्य स्वरूप कसे असावे, हा प्रश्न शेवटी माणसाला पडतोच. त्याचा शोध आजपर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आताही तेच करीत आहेत. उद्याही त्यांचा प्रवास असाच सुरू राहिल. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी वर्षानुवर्षे जगाच्या मागचे रहस्य उलगडण्याचा आपापल्या त-हेने प्रयत्न केला आणि करताहेत. जग हे नेमके कसे असते, याचा उलगडा कुणालाच होउ शकला नाही, असेही म्हणता येणार नाही. दुर्दैवाने म्हणावे तर त्यामागचे रहस्य आपल्यालाच पूर्णपणे कळू शकले नसावे, कदाचित ! यामागचे कारण असे की ज्या महापुरूषांना जग जसे दिसले, तसे सांगण्याच्या त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या भाषेपर्यंत किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवांपर्यंत पोहचण्यात आपणच कमी ठरत असावे, हे सुद्धा त्यामागचे कारण असू शकते. आजच्या विज्ञानातील "कॉम्प्यूटर सिम्यूलाईजेशन हायपरथेसिस' या सिद्धांताप्रमाणे महापुरूषांच्या अनुभवातील "ब्रम्ह सत्य, जगं मिथ्या' हा उपदेश पुरेसा असू शकतो. किंवा होलोग्राफिक प्रिंसीपलप्रमाणे प्रोजेक्टरमधील प्रकाशाच्या एका बिंदूतून पुढे जगाच्या अफाट विस्तारापर्यंत विकास पावलेल्या स्थितीपर्यंतही जगाचा प्रवास असू शकतो. आनंदने केलेल्या प्रश्नावर बुद्धाने दिलेल्या उत्तरातून जग क्षणोक्षणी प्रसरण पावत आहे, असा उपदेश करण्यामागे बुद्धांचे विज्ञानच नाही का?
हजारो वर्षांपासून भारतीय अध्यात्मशास्त्रातील "पिंडी ते ब्रम्हांडी' या सुत्रातूनही नेमके हेच अधोरेखित होते. म्हणून कुठेच उणेपणा न येता बुद्धपुरूषांची वचने आजही सर्वश्रेष्ठच ठरतात. ज्या महापुरूषांना हे कळले ते यातील "माईलस्टोन' म्हणून जगापुढे सिद्ध झाले. परंतु कुठल्याच संकल्पना पूर्णपणे समजून न घेता आपण निव्वळ विरोधाच्या पातळीवरच जाउन आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यास कारणीभूत असतो. प्रत्येक धर्माने जगाचे स्वरूप कसे असते हे सांगण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपण मात्र त्याचा मर्थितार्थ समजून घेण्याऐवजी धर्माच्या बाहयरूपातच मग्न झालो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञानातील भांडण वर्षानुवर्षे हे असेच सुरू राहणार आहे. खरे म्हणजे स्वतःला पदोपदी बदलविण्यात विज्ञान दिवसेंदिवस विनम्र मानत असते. दिसणा-या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडा, असा संदेश अध्यात्म देते. त्यावेळी आपण कधीच "सिरियस' नसतो. एकंदर कसे की आपण धड अध्यात्मीक किंवा विज्ञानविषयी जाणून घेण्यास दोन्ही पातळीवर अंधश्रद्धच असतो. मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. पण सदासर्वकाळ काही मूठभर लोकांसाठीच धर्म ही अफूची गोळी राहू शकतो. सगळयांसाठीच नाही. अनेकांसाठी तो सन्नमार्गावर चालण्यासाठी प्रेरक ठरत असतो. धर्म हा माणसाला नितीतत्वाशी जोडतो व एका उदात्त अशा ध्येयाकडे घेउन जातो. सरतेशेवटी आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञही म्हणून गेला की विज्ञानाशिवाय कुठलाही धर्म (कॉस्मीक रिलीजन) नसावा आणि धर्माशिवाय विज्ञान नसावे. कट्टरता ती धार्मिक असो वा पुरोगामी यातील कुठलीच गोष्ट योग्य नाही. म्हणून जे प्रत्यक्ष डोळयांनी दिसते आहे, ते तसेच असावे का, याबद्दल शंका घेणे ही आज खरी वैज्ञानिक बाब म्हणून पुढे येत आहे. यासाठी अनेकानेक सिद्धांत मांडण्यात आले. हे सर्व सिद्धांत समजून घ्यावे लागतील. उलट त्यांना टाळतो म्हटले तर सत्यापासून दूर जाण्यासारखे किंवा अंधारात जगण्यासारखी चूक कुठलीच ठरणार नाही.
विजयकुमार राउत