ओठात एक भाषा, पोटात और काही
अशा जगाशी, जमले कधीच नाही
जेथे कुणीच नसतो, माणूस माणसांचा
एैशा युगास आता, म्हणतात लोकशाही
ज्यांनी कधीच त्यांचे, विकले इमान आहे
हल्ली इथे तयांची, होते बरी कमाई
हेतू मला तयांचा, दिसतो जरा निराळा
ते चाहतात मित्रा, सारीकडे तबाही
डोळयात श्वापदांच्या, भरला विखार आहे
तू वाग मोकळे पण, थोडे जपून बाई!
या मैफलीत होती, शांती सभोवताली
तू वाद घातला अन्, झाली सुरू लढाई
बाहेरच्या जगाशी, ना हारलो कधीही
माझ्यातल्याच "मी' शी जिंकू कसा लढाई?
विजयकुमार राउत
vraut90@yahoo.com