मनासारखे घडेल सारे, असेहि नाही नशिबाचे चमकतील तारे, असेहि नाही तुफानास तू देशिल टक्कर जेव्हा जेव्हा तुला साथ देतील किनारे, असेहि नाही भरुन येईल आभाळाचे काळीज जेव्हा मयुराचे फुलतील पिसारे, असेहि नाही जीवन म्हणजे, सागर नाही, स्वर्ग सुखाचा दुःखचे नुसतेच पहारे, असेहि नाही जरी नसेना ही सजलेली वाट फुलांनी पायतळी असतील निखारे, असेहि नाही विजयाचा आनंद कुणाला व्यक्त कराया हवेत केवळ ढोल, नगारे असेहि नाही विजयकुमार राउत vraut90@yahoo.com | |||
-