Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 29 अगस्त 2019

विज्ञानातील स्थितंतर

विज्ञानातील उत्क्रांती म्हणा वा स्थित्यंतरे हे विशिष्ट टप्प्यांवर पदोपदी घडत जातात. कारण विज्ञान परिवर्तनशिलता मानते. भौतिकशास्त्र घटनांकडे एकेका "फ्रेम' मधून पाहत असल्यामुळे प्रत्येक घटनेमागचे रहस्य समजून घ्यायचे असेल तर त्या त्या फ्रेममधून एकेक बाबी स्पष्ट होउ पाहतात.
ठळक टप्प्यात विज्ञानाची कार्यशैली समजून घ्यायची असेल तर वीसच्या दशकात विज्ञान प्रामुख्याने दोन गटात विभागले जाउ लागल्याचे आपल्या निदर्शनास येते. पहिला गट म्हणजे पदार्थ मानणारा, तर दुसरा पदार्थांच्या पलिकडे जाउन त्यातील "एनर्जी' च्या रूपातून निर्माण होणा-या "वेव्ह' स्वरूपात जाणणारा. या "वेव्ह' किंवा लहरी कशा बनतात, यामागचे रहस्य पुढे समजून घेउ. सदयाच्या मुद्‌दयावर ऐवढेच समजून घेउ. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पदार्थांवर संशोधन करून भौतिकातील काटेकोर नियम सांगणारे क्‍लासीकल फिजीक्‍स व दुसरा गट क्‍वॉंटम फिजीक्‍स. क्‍वॉटम फिजीक्‍स जाणण्यासाठी दृष्टी व जाणिव अधिकाधिक सूक्ष्म करावी लागते. तिथे स्थुल स्वरूपात वेगळा तर सूक्ष्म रूपात वेगळा असा द्विअंगी अनुभव येतो. जरी हा अनुभव प्रत्यक्ष डोळयांनी दिसत नसला तरी त्यातील घडामोडी मात्र अगदी सुक्ष्मातिसूक्ष्मरित्या समजतात. म्हणजे ख-या अर्थाने अणूरेणूचे एकंदर वागणे "डयुयॉलिटी' स्वरूपाचे असते, असे लक्षात येते. म्हणजे पदार्थ एकतर अणूरूप तसेच लहरी असा दोन स्थितीत अनुभवायला मिळतो.
वैज्ञानिक विश्‍वातील परिभाषांना नवी दृष्टी देणारे वर्नर हेईजनबर्ग यांनी ख-या अर्थाने "अनसर्टीनिटी प्रिंसीपल' सांगून मानवजातीची अख्खी दृष्टीच बदलून टाकली. त्यांनी 1927 मध्ये अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत प्रतिपादीत करताच सगळयांची बोबडी वळली. त्यावेळी अल्बर्ट आईनस्टाईनचा सापेक्षततेचा सिद्‌धांत बराच लोकप्रिय झाला व तो सद्‌सदविवेकबुद्‌धीच्या कसोटीवर खरा ठरला होता. सृष्टीचे एकूण तत्व हाती लागल्याचा जगाला अतिव आनंद झाल्यामुळे सगळीकडे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्‌धांताचा उदोउदो सुरू होता. जणू स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच मानव जातीला आनंद झाला असावा. त्याच्यामागचे कारणही तसेच होते. सापेक्षता सिद्‌धांत इलेक्‍ट्रान, प्रोटान, न्यूट्रानच्या एकंदर स्थितीवर सापेक्ष भाष्य करणारा होता. म्हणजे सृष्टीत घडणा-या प्रत्येक पदार्थाचे भविष्य कसे असेल, याबद्‌दल अणूंच्या गतीवरून ते सिद्‌ध करता येत असल्याचा अविर्भाव दाटून आला होता. यातील विनोद म्हणजे सापेक्षतावाद जर एखाद्या मच्छराच्या बसण्यावरून त्याची पुढील स्थिती सिद्‌ध करीत असेल तर मग पुढे तो मच्छर जर मरणार तेव्हा तो नेमका कशाने मरणार आहे, मस्कीटोमॅटने की एखाद्याच्या अंगावर बसल्यामुळे त्याच्या थापेने? असा प्रश्‍न हेडजेनबर्ग याने केला होता. वास्तविक पाहता दोघेही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य होते.
जर्मनशास्त्रज्ञ वर्नर हाईजनबर्ग यांचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांतावरून आईनस्टाईन यांच्यात नंतरच्या काळात बरेच वादविवाद झाले. हेईजनबर्गच्या सिद्‌धांतावरून क्‍लासिक फिजीक्‍समध्ये अख्खे विज्ञान दोन गटात विभागल्या गेले. कालपरवापर्यंत या मतभेदातील दरी कायम राहिली. मात्र आता केवळ तार्किक बुद्‌धीचेच परिमाण न लावता शास्त्रज्ञ वेगळया दृष्टीतून बघायला लागले आहेत. म्हणून आधुनिक विज्ञान आता तर्काची भाषा सोडून वेगळी भाषा बोलायला लागले आहे. या वादातून आईनस्टाईन यांच्या संशोधनाला त्याकाळी तथाकथीत विज्ञानवादी "यहुदी विज्ञान' म्हणून हिणविले जायचे. सृष्टीचा व्यापार निसर्गानेच निर्माण केलेल्या "परफेक्‍ट' नियमानुसार चालतो, असा आईनस्टाईचा दावा होता. तो नियम कोणता तर "सापेक्षतावाद' यानुसार चालतो, असे आईनस्टाईनचे म्हणणे होते. अनेकदा निसर्गाच्या घटनांबाबत भाकीत करणे किंवा आपण पाहतो त्याप्रमाणे त्यांची योग्य स्थिती समजून घेता येणे शक्‍य नाही, थोडक्‍यात यालाच अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत म्हणतात.
हाईजनबर्गचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत समजून घेण्यापूर्वी आईनस्टाइनचा सापेक्षता वाद समजावा लागेल.

जग हे अनिश्‍चितीतेचे

uncertentity principal
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते' अशी आपल्याकडे म्हण आहे. दैनंदिन जीवनात त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. निश्‍चित हे जग कसे आहे, कशाने बनले आहे, यामागचे सत्य स्वरूप कसे असावे, हा प्रश्‍न शेवटी माणसाला पडतोच. त्याचा शोध आजपर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आताही तेच करीत आहेत. उद्याही त्यांचा प्रवास असाच सुरू राहिल. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्‍तींनी वर्षानुवर्षे जगाच्या मागचे रहस्य उलगडण्याचा आपापल्या त-हेने प्रयत्न केला आणि करताहेत. जग हे नेमके कसे असते, याचा उलगडा कुणालाच होउ शकला नाही, असेही म्हणता येणार नाही. दुर्दैवाने म्हणावे तर त्यामागचे रहस्य आपल्यालाच पूर्णपणे कळू शकले नसावे, कदाचित ! यामागचे कारण असे की ज्या महापुरूषांना जग जसे दिसले, तसे सांगण्याच्या त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या भाषेपर्यंत किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवांपर्यंत पोहचण्यात आपणच कमी ठरत असावे, हे सुद्‌धा त्यामागचे कारण असू शकते. आजच्या विज्ञानातील "कॉम्प्यूटर सिम्यूलाईजेशन हायपरथेसिस' या सिद्‌धांताप्रमाणे महापुरूषांच्या अनुभवातील "ब्रम्ह सत्य, जगं मिथ्या' हा उपदेश पुरेसा असू शकतो. किंवा होलोग्राफिक प्रिंसीपलप्रमाणे प्रोजेक्‍टरमधील प्रकाशाच्या एका बिंदूतून पुढे जगाच्या अफाट विस्तारापर्यंत विकास पावलेल्या स्थितीपर्यंतही जगाचा प्रवास असू शकतो. आनंदने केलेल्या प्रश्‍नावर बुद्‌धाने दिलेल्या उत्तरातून जग क्षणोक्षणी प्रसरण पावत आहे, असा उपदेश करण्यामागे बुद्‌धांचे विज्ञानच नाही का?
हजारो वर्षांपासून भारतीय अध्यात्मशास्त्रातील "पिंडी ते ब्रम्हांडी' या सुत्रातूनही नेमके हेच अधोरेखित होते. म्हणून कुठेच उणेपणा न येता बुद्‌धपुरूषांची वचने आजही सर्वश्रेष्ठच ठरतात. ज्या महापुरूषांना हे कळले ते यातील "माईलस्टोन' म्हणून जगापुढे सिद्‌ध झाले. परंतु कुठल्याच संकल्पना पूर्णपणे समजून न घेता आपण निव्वळ विरोधाच्या पातळीवरच जाउन आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यास कारणीभूत असतो. प्रत्येक धर्माने जगाचे स्वरूप कसे असते हे सांगण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपण मात्र त्याचा मर्थितार्थ समजून घेण्याऐवजी धर्माच्या बाहयरूपातच मग्न झालो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञानातील भांडण वर्षानुवर्षे हे असेच सुरू राहणार आहे. खरे म्हणजे स्वतःला पदोपदी बदलविण्यात विज्ञान दिवसेंदिवस विनम्र मानत असते. दिसणा-या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडा, असा संदेश अध्यात्म देते. त्यावेळी आपण कधीच "सिरियस' नसतो. एकंदर कसे की आपण धड अध्यात्मीक किंवा विज्ञानविषयी जाणून घेण्यास दोन्ही पातळीवर अंधश्रद्‌धच असतो. मार्क्‍स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. पण सदासर्वकाळ काही मूठभर लोकांसाठीच धर्म ही अफूची गोळी राहू शकतो. सगळयांसाठीच नाही. अनेकांसाठी तो सन्नमार्गावर चालण्यासाठी प्रेरक ठरत असतो. धर्म हा माणसाला नितीतत्वाशी जोडतो व एका उदात्त अशा ध्येयाकडे घेउन जातो. सरतेशेवटी आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञही म्हणून गेला की विज्ञानाशिवाय कुठलाही धर्म (कॉस्मीक रिलीजन) नसावा आणि धर्माशिवाय विज्ञान नसावे. कट्‌टरता ती धार्मिक असो वा पुरोगामी यातील कुठलीच गोष्ट योग्य नाही. म्हणून जे प्रत्यक्ष डोळयांनी दिसते आहे, ते तसेच असावे का, याबद्‌दल शंका घेणे ही आज खरी वैज्ञानिक बाब म्हणून पुढे येत आहे. यासाठी अनेकानेक सिद्‌धांत मांडण्यात आले. हे सर्व सिद्‌धांत समजून घ्यावे लागतील. उलट त्यांना टाळतो म्हटले तर सत्यापासून दूर जाण्यासारखे किंवा अंधारात जगण्यासारखी चूक कुठलीच ठरणार नाही.
विजयकुमार राउत 
 
Blogger Templates