Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 21 दिसंबर 2017


मी'ज्ञान

* विजयकुमार राउत
..........
ज्ञान, विज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या. माणसाने कर्तृत्वाच्या सगळया दिशा पादाक्रांत केल्या. सगळे शोध लागले. तरीही काहीतरी राहूनच गेल्याचे शल्य हातात उरले. काय आहे ते? सिकंदर, सम्राट अशोक आणि अलिकडचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना जीवनात संघर्ष करून काय मिळाले? यांच्या विजयाला अपयशाची काळी किनार का?मोबाईल, इंटरनेट सारखी साधने हाती लागूनही संवाद का होत नाही? असे अनेक प्रश्‍?न दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. दुनियेतल्या सगळया ज्ञानाची ओळख झाली परंतु "मी' तरीही कायमच उरला आहे. "मी' जाणल्याशिवाय माझं जिवन कसं असेल, याचे उत्तर मिळणार नाही.
***********************
"मी' आणि "माझे' या चक्रव्यहात आपण आजन्म गुंतलेले असतो. मी आणि माझया पलिकडे काही नाहीच, अशी आपली ठाम धारणा असते. मला कोण काय समजते, यावर आपल्या जीवनाची अख्खी इमारत उभी राहते. स्वतःची स्तुती करताना सुप्तावस्थेत असलेला "मी' अधूनमधून डोके वर काढतोच काढतो. आयुष्यभर खोटया समजूती , खोटया कल्पनेत वावरताना आपण सत्यापासून खूप दूर गेलेले असतो. जीवनभर ज्याला आपण ज्ञान संबोधतो मुळात ते जसे समजतो तसे नसतेच. आपण एकमेकांची स्तुती करतो, म्हणजे नेमके काय करतो? याचं उदाहरण म्हणजे इसापनितीतील जिराफला कावळा म्हणतो काय तुमची सुंदर मान आहे ! आणि मग कावळयाला खुश करण्यासाठी जिराफही त्याची भरभरून स्तुती करतो. म्हणतो, काय मस्त तुमचा आवाज आहे ! फार सुंदर गाता तुम्ही !' या दोघांचीही स्तुती खरी आहे का ? दोघांनाही बरं वाटावं त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो.समाजाचा व्यवहारही असाच चालतो. खोटं खोंटं जगणं नशिबी येतं. शेक्‍?सपिअरने म्हटल्याप्रमाणे आपण दुनियेच्या विशाल रंगमंचावरील केवळ एक पात्र ठरतो. समाजात वावरताना अनेक भूमीका पार पाडत जातो. बरं भूमीकेचं जाउ द्या, खर तर आपण जीवन जगतो का?दुभंगलेले व्यक्‍?तीमत्व घेउन आपण जगत असतो. क्षणात एक विचार, दुस-या क्षणात दुसरा विचार. कधी राग, कधी क्रोध या दोन टोकांवर आपण विभागलेले असतो.
सिद्‌?धार्थ ऐश्‍?वर्याचा त्याग करून सत्य शोधायला गेले आणि बुद्‌?धत्व प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा सगळा शोध संपला. सत्य शोधण्यासाठी योग्यता कमवावी लागते. त्यासाठी बुद्‌?ध देवत्व नाकारतात आणि आचरणाला महत्व देतात. देवत्वाठी आग्रह धरण्याऐवजी पंचशिल पाळण्याचा नियम सांगतात. या नियमातूनच मग खरा माणूस घडण्याची किमया घडत असते. "तथागत' शब्दाचा अर्थ होतो तथ्यागत...तथ्य, सत्य असेल तेच बोलणार. किंवा जसं आहे तसं स्वीकारणे. सत्याच्या पलिकडे काहीच नाही. सत्याच्या थोडयाफार अंशाला आपण सत्य समजून असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे विज्ञान असं म्हणतं, विज्ञानात तमकं सांगीतले आहे. आपल्या विधानाला सत्याचा आधार मिळाला किंवा समोरच्याने ते ग्राहय मानावे, यासाठी सुरू होते आपली अहमहिका. सायंटीफिकली ते सिद्‌?ध झालेले आहे, बरं का, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अंतिम सत्य सांगीतल्याचा आपला समज असतो. देशात विज्ञान , तंत्रज्ञान अधिकाधिक उन्नत व्हावे, असे कुणाही सुज्ञ व्यक्‍?तीला वाटणार. परंतु समाजात जो विज्ञानाचा दावा करतो त्यानं तरी विज्ञानाची किती माहिती घेतली? स्वतःला कधी "अपडेट'केलं का? विज्ञान दररोज नवनवी क्षितीजे व्यापत आहे. जुने आणि नवे याचा संगम विज्ञानात पहायला मिळतो. म्हणून विज्ञानही अंतिम दावा कधीच करीत नसते. मात्र जे विज्ञानाविषयी अल्पज्ञानी असतात, ते मात्र विज्ञानाच्या नावावर भांडायला तयार होतात. वाद घालतात. स्वतःला पुरोगामी समजून स्वतःचीच हेटाळणी करतात. त्यालाच नकली पुरोगामित्व असे म्हणतात. विज्ञानात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ अगदी विनम्रपणे आपल्या मर्यादा आणि सत्याचे अमर्यादीत्व ओळखून झटत आहेत. केवळ अल्पांशाने सत्य हाती लागले आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मानतात. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नकली पुरोगामीत्ववादाने पछाडलेल्यांनी केलेल्या दाव्यात फक्‍?त "मी' असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात सत्याचा अंशही सापडणे कठीण असते. जसे पुरोगामी तसेच प्रतिगामी. दोन्ही निव्वळ बुडबुडे. दोघेही दावे देत भांडत बसणार. लिळाचरित्रातील "चार आंधळया'सारखी यांची गती.
सत्य जाणणारा साक्रेटीस तर म्हणतो , "आय क्‍?नो, आय डोंट नो', "सत्यम शिव सुंदरम'...आपले जीवन सुंदर असायला हवे, असे वाटत असेल तर सत्याने जगायला शिकले पाहिजे. अलिकडे शब्दांचा वापर जास्त प्रमाणात होउ लागला आहे. संवाद साधण्यासाठी मोबाईल, इंटरनेट सारखे विविध उपकरणे आपल्या हातात आली आहेत. तरीही संवादातील " गॅप' अजूनही आपल्याला भरून काढता आली नाही. भाषेने नवनवीन शब्द शोधून काढले तरी सत्यापर्यंत ती नेउ शकली नाही. कधी नव्हे इतकी समाजात दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला काहीतरी सांगण्याची घाई झालेली आहे. जगण्यातला वेग वाढतो तसतसे आपण विनाशात्वाच्या दिशेने फार वेगाने सरकत जातो. कुणाला श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे. कुणाला स्वतःची प्रतिमा तयार करण्याची घाई झालेली आहे. ही घाईच सर्व बाजूंनी व्यापून अक्राळविक्राळ समस्येचे रूप धारण करीत आहे.
"मी' किंवा माझी ओळख झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही. सगळे दावे खोटे ठरतात. सगळया कल्पना ,सगळया व्याख्या फोल ठरतात. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला "अहं ब्रम्हास्मी' म्हटलं. त्यामुळे समाजात घोळ निर्माण झाला. प्रत्येक जण स्वतःला "ग्रेट' समजायला लागला. दुस-याला तुच्छ लेखण्याशिवाय त्याचे "मीत्व'अपूर्ण राहू लागले. अडिच हजार वर्षापूर्वी मात्र बुद्‌?धाने "अत्त दीप भव' म्हणजे "तूच तुझा प्रकाश हो' म्हटलं तेव्हा त्याला भाषेतलं आणि एकूणच जगण्याचं सत्व कळलं. मित्रांनो, माणूस होण्याची वाट सरळ नाही. आणि सत्य जाणल्याशिवाय मनुष्य प्राण्यातील अपूर्णत्व कायमच राहणार. मानवी जिवनातील पूर्णत्व जाणून घेतल्याशिवाय संत साहित्यातील सत्व कळत नाही. कुणाला वगैरे नाव ठेवणं तर सगळयात छोटी गोष्ट. "मी' शिवाय जे कळायला लागते ते ज्ञान . ज्यात "मी' म्हणजे अहंभाव असतो, ते केवळ अज्ञानच !
"मी' पण ज्याचे पक्‍व फळापरी
अलगद गळून पडले हो !
जीवन त्यांना कळले हो !
असे कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात ते उगाच नाही !

गुरुवार, 23 मार्च 2017

डोळे उघडा "वि'ज्ञानेश्‍वरा !


विजयकुमार राउत

अवघ्या 18 वर्षात ज्ञानेश्‍वरी सारखा ग्रंथ लिहून जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा संत ज्ञानेश्‍वर 700 वर्षापूर्वी होउन गेला, यावर कुणाचा विश्‍वास बसत नसेल. इवलंस रोप आणि त्याच्या प्रतिभेचा वेलू केवढा? तर गगनाला भिडणारा...सगळया ज्ञात अज्ञात जगताचं कोडं त्यानं आपल्या प्रतिभेच्या उत्तुंगतेतून उघडं केलं, हा वागविलासाचा केवढा मोठा प्रताप !
"मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा' अशी ज्ञानेशाची हळूवार समजूत काढताना लहानगी बहिण मुक्‍ताई आईची ममता अंगी शिरवून दुनियेची रितभात सांगते. तेव्हा ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभावंतालाही आपल्या कर्तृत्वाची जाण यायला वेळ लागत नाही. मित्रहो असे "ज्ञानेश्‍वर' जेव्हा जेव्हा जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या वाटयाला सा-या जगाचा उपहासच येत असतो. हा निसर्गनियमातील विरोधाभास, आणि तो निसर्गमान्य आहे, हेच खरे. उजेडाला व्यक्‍त व्हायला शेवटी काळोख हवा असतो !
ैहम घरमे जब दीप जलाने लगते है !
घरके अंधेरे शोर मचाने लगते है!!
कधी कधी चिंतातूर जंतूचं मात्र हसू येतं. त्यांची शंका अशी की सोळा वर्षाचा कोवळा मुलगा अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी काय लिहितो.....21 व्या वर्षी समाधी काय घेतो.. इत्यादी..इत्यादी..(आमचा घोडया दहावीची परीक्षाही निट पास होत नाही. नापास झाल्यानंतर राजकारण किंवा क्रिकेटशिवाय त्याला काही येतही नाही...म्हणून)कविवर्य गोविंदाग्रजांची शपथ घेउन त्यांची माफी मागतो. असा विरोध करणे हेच चिंतातूर जंतूंचं एकमेव आणि पोष्टीक खाद्य असावं, अशी मलाही नाईलाजाने शंका यायला लागली! कदाचित निव्वळ विरोधावरच या जंतूचं पोषण उत्तमरित्या होत असावं, त्यामुळे त्यांना अनेक युगाचं आयुष्य आहे. जिते रहो...!!
सदया असे शंकासुर आणि चिंतातूर जंतूच समाजात युगेयुगे इतिहासाचं उत्खनन स्वतःच्या फायदयासाठी करताना दिसतात. आपल्या आपल्या कुवतीनुसार जातीपातीत संत, महापुरूषांची विभागणी करून त्यांना जातीच्या कोंदनात बसवून पुजा बांधली जाते.
मित्रहो, हा देश युवकांचा देश म्हणून सा-या जगात गणल्या जातो. परंतु येथील युवकाचे जगणे खरेच युवकासारखे आहे का? त्यांचे मानसिक वय किती वर्षाचे? असे प्रश्‍न निर्माण होतात. जी विद्याशाखा पुढे येते, युवक करिअरसाठी मोठया संख्येने त्या शाखेत प्रवेश घेतात, ती विद्याशाखा कालांतराने बेरोजगार करण्याइतकी पांगळी कशी काय होते, हेच कळत नाही. कुठलीही विद्याशाखा विस्ताराने खुप मोठी असते. तिथपर्यंत िंकंवा तिच्या आसपासही आपण पोहचू शकत नाही. आपण आपल्या प्रतिभाशक्‍तीच्या जोरावर त्या शाखेला अधिकाधिक समृद्‌ध करू शकतो, हे आमच्या गावीही नसते. म्हणून नवनविन संशोधनावर काय फक्‍त पाश्‍चात देशाचीच मक्‍तेदारी असावी?
ज्या समाजात प्रतिभावंत शास्त्रज्ञ , विचारवंत, कवी, कलावंत, खेळाडू जन्माला यायला हवेत, त्या समाजात जास्तीत जास्त संख्येने आता केवळ आणि केवळ "एकसारखे'च जन्माला येताहेत. जागोजागी मेंढराचे कळप तयार होताहेत. म्हणून आजचे "ज्ञानेश्‍वर' बेरोजगार होउन गल्लोगल्ली भटकताना दिसतात. त्यांच्या हाताला काम नाही. पुस्तकांच्या ठिकाणी मोबाईल आला आणि आमचे "ज्ञानेश्‍वर' आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवरून आपल्या कर्माच्या सुसाट ओव्या लिहित सुटले आहेत. या नवीन ऍप्सवरून नवीन नवीन अफवांचे पिक घेण्याचा मौसम अनुकूल होत आहे. नवनवीन शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या फायदयासाठी एखादया विषयावर "जावई शोध' लावून एखादयाच्या चारित्रयावर शिंतोडे उडविण्यातच सगळी उर्जा वाया घालविली जात आहे. कट्‌टयावर बसून फालतू चर्चांत वेळ दवडू लागले आहेत. संशोधनाची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याऐवजी "कॉपी पेस्ट' करून त्यात "मास्टरकी' मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात पुस्तकांची आवड कमी झाल्यामुळे मोबाईलवर "गेम' खेळून आपल्याच जीवनाचा"गेम' करण्याकडे आपला "इस्ट्रेस्ट' वाढत आहे. पुस्तकाला "गुगल' हा पर्याय असूच शकत नाही, असे शहाणीसुरती माणसं म्हणतात.
आपली विज्ञानाविषयीची समजूतही फारच बाळबोध. शाळेत शिकत असताना जेवढे विज्ञान आपण आत्मसात केले त्यापुढे काकणभरही न सरकण्याची शपथ आपण शिक्षण पूर्ण होताच घेउन टाकतो. सदयाच्या काळात विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यापैकी आपल्याला काय माहिती आहे. नवनवीन संशोधनांची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत केल्या जाताहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादालाही "क्‍वॉंटम थेरी'तून चॅलेंज मिळत आहे. अख्खे जीवनाचे संदर्भ बदलून टाकणारा अतिवेगवान क्‍वॉंटम कॉम्प्यूटर जन्मास येत आहे. भविष्यकाळात भौतीक शास्त्रातील अनेक सिद्‌धांत "ब्लॅक होल' किंवा कृष्ण विवरांमुळे मोडीस निघतात की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तरीही आपण मात्र वैज्ञानिक अहंकार जोपासतो आहोत. विज्ञानाचा अहंकार सांगून आपले "पुरोगामित्व' पुढे करण्याचा नवीन अंधविश्‍वास तयार होत आहे. मुळात बदलण्यापेक्षा अहंकार जोपसणे आपल्याला महत्वाचे वाटते. परंतु शास्त्रज्ञ मात्र आम्ही शून्य पॉईंट शून्यावर आहोत, अजून काही ठामपणे सांगू शकत नाही, असे प्रामाणिक कबुल करतात.
थोर शास्त्रज्ञ न्युटनला एकदा त्याच्या मित्राने विचारले की, तू हे सर्व शोध कसे काय लावतोस ? त्यावर न्युटन उत्तरला की मी महासागरातील अथांग पाण्यातील एक थेंब आहे. मी माझ्या मोकळ्या वेळात येशु ख्रिस्ताचे चिंतन करीत बसतो. आम्ही शास्त्रज्ञ शोध कसे लावले सांगू शकत नाही. आम्ही केमीकलमध्ये केमिकल मिसळतो. वायरला वायर जोडतो व त्या निष्काम प्रयत्नातून अचानक आमच्या डोक्‍यातून वीज चमकल्यासारखा लख्खकन प्रकाश पडतो व नकळत आमच्या हातून शोध लागून जातो. पण या क्रियेच्या पाठीशी एकमेव ईश्‍वर असतो, असे न्युटन म्हणतो तेव्हा आमच्या बुद्‌धीची किव करावीसी वाटते.
अलीकडे शे-दिडशे वर्षापूर्वी जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्याचे मुळ ज्ञानेश्‍वारीत सापडते, म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरणार नाही. सुर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरते. हा शोध कोपर्निकसने दिडशे वर्षापुर्वी लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोध असल्यामुळे धर्ममार्तंडांनी त्याचा छळही केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सुर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्‍वरीत सातशे वर्षापुर्वीचे पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. आणि उदो अस्तुतेनि प्रमाणे। जैसे न चालता सुर्याचे चालणे। तेसे नैष्कर्मत्व जाणे।
उदय आणि अस्त होत असल्यामुळे सुर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सुर्याचे न चालता भ्रम निर्माण होणे हा ज्ञानेश्‍वरांचा क्रांतीकारक शोध नाही का?
असे ज्ञानेश्‍वर पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत. तेव्हाच आम्ही "आता विश्‍वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे' अशा पसायदानातून सा-या जगात विश्‍वाचा महागुरू होण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकतो. म्हणून ज्ञानेश्‍वरांवर टिका करणा-यांनी ते आपल्या गोड भाषेत काय सांगतात, याकडे लक्ष द्यावे.
माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आईवडिल कसे असावेत, हे माझया हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्‌दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्‍कीच सुखी करू शकतो. मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करीत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल ती संधी मी गमाविता कामा नये.
विजयकुमार राउत
8888876462


गुरुवार, 9 फ़रवरी 2017

अक्‍कल नाय? डोन्ट वरी.....


                                                                                                                 *विजयकुमार राउत
अक्‍कल नावाची काही गोष्ट आहे का तुझयाकडे? थोडी अक्‍कल तर वापरत जा ! परमेश्‍वराने अक्‍कल वाटली तेव्हा कोठे होतास रे?अशी वाक्‍ये नेहमीच्याच परिचयातली. अक्‍कल म्हणजेच सर्वस्व. थोडी चूक झाली की अक्‍कलेत कच्चे असलेल्यांना अक्‍कलवानांकडून टोमणे खाणे ठरलेलेच. बरं जो अकलेवरून इतरांना कमी लेखतो त्याने किती अकलेचे दिवे पाजळले याचा हिशेब मागायचा कोणी? काही जण दिवसरात्र "अकलेचेच तारे' तोडत बसतात. मित्रहो, सचिन तेंदुलकरने कुठली डिग्री घेतली? टाटा, धीरूभाई अंबानीनी कुठल्या "एमबीए'त गोल्ड मेडल मिळविले ? लता मंगेशकर यांनी गायनात कुठल्या विद्यापीठातून "पीएचडी' केले. देशविदेशात प्रत्येक मैफलीत "वाह उस्ताद' ही दाद घेण्यापूर्वी उस्ताद जाकीर हुसेन यांनी कुठल्या कॉलेजमधून "मेरीट' घेतले नाही. अशी अनेक उदाहरणे मिळतील. मग आपल्याजवळ "ती' नसली तर काय बिघडतं? असं कदाचित अक्‍कलशून्य माणसाला एखादवेळेस वाटू शकेल. परंतु अकलेच्या महाभागांना मात्र दुस-याजवळ नसलेल्या कुठल्यातरी नेमक्‍या अकलेबद्‌दल मरदुमकी वाटत असते आणि मग त्याच्या बुद्‌धीमत्तेवर अगदीच तोंडसुख घेणे म्हणजे शहानपणा समजतात. अक्‍कल नसली तर समाजात जगणंच अशक्‍य. बरं अक्‍कल आहे किंवा नाही हे कोणी ठरवावं?
बरं आज बुद्‌धीचे मापन करणा-या "आयक्‍यू'सारख्या "टेस्ट' खूप मागे पडल्याचे दिसून येते. एखाद्या क्षेत्रातील जेमतेम ज्ञान असणे आता "आउटडेट' होत आहे. आता नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होत आहेत. शैक्षकि मानसशास्त्रात आणखी नउ बुद्‌धीमत्ता जोडण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस नवनविन संशोधनातून पुढे येणा-या बाबीनुसार आता बुद्‌धीच असून चालत नाही. केवळ बुद्‌धी आणि बुद्‌धीच्या भरवशावर जगणारे पदोपदी मागे पडताना दिसतात. जुन्या संकल्पना नव्याने तपासून बघीतल्या जात आहेत. जुन्याला नवीन संकल्पनांची जोड देण्यात येत आहे. या संकल्पना नविन चष्म्यातून पाहण्यात येत आहेत. एवढच काय ते नाविण्य ! एरवी भारतासारख्या देशात या संकल्पना खूप खूप वर्षापूर्वीही होत्याच, हे आपण जाणतोच. या देशात तथागतांच्या बाबतीत "महाकारूनिक' आणि भगवान शंकराच्या बाबतीत "करूणावतारम' म्हटल्या जातं. "थर्ड आय' आणि "सम्यक ज्ञान' या अगदी समान संकल्पना. समाजातील असामान्य माणसं केवळ बुद्‌धीच्या भरोशावरच पुढे गेलीत का, याचा कित्येक दिवसापासून आढावा घेतला. असं लक्षात आलं की ज्या निसर्गानं आपल्याला मेंदू , ह्रदय यासारखी इंद्रीये दिली, त्याचा वापर कशासाठी करायचा? प्रत्येकाचं एक मर्यादित क्षेत्र आहे. प्रत्येकाचं कामही वेगवेगळं आहे. " IMGINATION IS GRATER THAN KWOLADGE* असं म्हणणारा असामान्य बुद्‌धीमत्तेचा धनी असलेला अर्ल्बटही आईनस्टाईनही काहीसं हेच सांगतो.
काल परवापर्यंत शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगाच "स्मार्ट' समजल्या जायचा. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमधील निसर्गरम्य ठिकाणी मातीत खेळणारे विद्यार्थी असोत नाही तर अमिर खानच्या "तारे जमिनपर' चित्रपटातील मंदबुद्‌धी समजला जाणारा विद्यार्थी. मंदबुद्‌धी म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या "न्यूटन'चेच उदाहरण घ्या. या देशात महान प्रतिभेचा शोध घ्यायचा असेल तर शेवटच्या बाकावरून घ्यावा लागेल, असे वक्‍तव्य डॉ.अब्दुल कलाम करतात,
"आयक्‍यू' सोबत आता तुमच्यात "ईक्‍यू' भावनिक बुद्‌धीमत्ता त्याचबरोबर "एसक्‍यू' आध्यात्मिक बुद्‌धीमत्ता नसेल तर बौद्‌धीक बुद्‌धीमत्ता कामाचीच नसल्याचे सिद्‌ध होत आहे. व्यक्तीच्या विकासात तार्किक बुद्धीइतकंच भावनेचंही महत्वव पुढं लक्षात येऊ लागलं आणि त्यातून भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन यांची संकल्पना पुढं आली. "इ' म्हणजे एनर्जी आणि मोशन म्हणजे गती यातून "इमोशन'शब्द आला. व्यक्‍तीच्या अवचेतन मनातील विचारांना सकारात्मक भावनांची जोड दिली तर स्वप्नांनासुद्‌धा पाहिजे तो आकार देता येतो, हे आजवरच्या महान प्रतिभावंताच्या कृतीतून दिसून येते. परंतु एवढयावरच संपले नाही तर आणखी एका बुद्‌धीमत्तेची गरज निर्माण झाली. त्याच्यापाठोपाठ गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर बहुविध बुद्धिमत्ता ही हॉवर्ड गार्डनर यांची संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्रात प्रचारात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बुद्धिमत्तेच्या नऊ वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर "एसक्‍यू'ही नव्याने आलेली संकल्पना सदया अख्ख्या जगात रूळली आहे. डॅना झोहर, सिंडी विगल्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी आध्यात्मिकता हा विषय केवळ धार्मिक अथवा तात्विक स्वरूपाचा नसून, मानसशास्त्रीय असल्याचं सांगून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा आधार दिला. त्यासंबंधीच्या मेंदूविषयक संशोधनाची जोड दिली आणि त्यातून माणसाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शास्त्रशुद्ध वेध घेतला.
लता मंगेशकर, पं.जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन आदी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या प्रकारात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्‍लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल. भावनिक बुद्‌धीमत्ता वाढविण्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणे, संगीत ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे यासारखे छंद जोपासता योत. प्रत्येक माणूसच संवेदनशिल असतो. परंतु त्याला आपल्या भावनांना निकोप बनविणे सहसा जमत नाही. भावनेच्या आहारी जाउन तो स्वतः कमकुवत करीत असतो. चित्रपट, नाटकातून अभिनय करणारा कलावंत काय करतो? भूमीकेत शिरून आपली भावनिक बुद्‌धीमत्ता पणाला लावूनच तो यशस्वी होत असतो. कला क्षेत्र भावनिक भूक भागविण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर अध्यात्मिक बुद्‌धीमत्ता कुठल्या धर्माशी जोडत नाही, तर आपले आपल्याशीच, आपल्या अस्तित्वाशी जोडत असल्यामुळे व्यवहारासोबतच जीवनातील प्रत्येक प्रसंगात यशस्वी होण्याचा मंत्र देते. प्रत्येक व्यक्‍ती काही ना काही वैशिष्टये असतात. ती शोधली तर आपल्याच "विक प्वाईंट'वर स्वार होउन यशाच्या दिशेने पुढचा प्रवास करता येतो. म्हणून आपल्याकडे काहीच नाही...म्हणून कुढत बसण्यापेक्षा तुमच्यातील उत्तम, सर्वोत्तम शोधले तर तुम्हीही जगात अप्रतिम होउ शकता. हे केवळ मी सांगत नाही, तर अलीकडचे संशोधन सांगते.
gazalesathi.blogspot.com
 
Blogger Templates