Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

रविवार, 1 फ़रवरी 2015

जुनी बाटली ,नवीन दारू


                                                                                            विजयकुमार राउत

प्रजासत्ताक दिनाचे कार्यंक्रम आटोपल्यानंतर नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागात फिरण्याचा मोह झाला. म्हणून पाच मित्रांसोबत एका मित्राच्या कारने जाण्याचा योग आला. नेहमीच्या कोलाहलापासून दूर जाउन थोडी मौज करण्याचा छंद आता काहींना वाटू लागला. परंतु एखादया निर्जन ठिकाणी जात असताना मोजक्‍या लोकांच्या सोबतीने वारंवार गेल्यानंतर अल्पावधीत तेथे खूप गर्दी व्हायला लागते .. आणि हळूहळू तेही ठिकाण गर्दीच्या कोलाहलाने व्यापून जाते. अशा एक ना अनेक ठिकाणी गर्दीचे अतिक्रमण होत गेले आहे. मग त्या ठिकाणचे सौंदर्यच हळूहळू लोप पावत जाते...आणि उरतो केवळ कोलाहल. कानाला बोचणा-या कोलाहलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, पुन्हा त्याच कर्णकर्ककश आवाजाने माणसाचा पाठलाग करावा अशी स्थिती आहे. छोटी मोठी पर्यटनस्थळे अशीच शांततेचा खून करून गर्दीच्या "मार्केटींग'वर उभी राहात आहेत. तर असो. ज्या शिवारात आम्ही गेलो ते शिवार काही खूप प्रसिद्‌ध नव्हतं. परंतु जंगलाच्या सहायान वेळ मिळाल्याने थोडी भ्रमंती करून घ्यावी व थोडे मनाचे आवडीचे क्षण जगून घ्यावे, अशी सर्वांचीच इच्छा असल्यामुळे तेथे गेलो होतो. जंगलाच्या शेजारी असलेल्या गावात तर सण असल्यासारखी स्थिती होती. कारण शहरातून येणा-यांनाही "मोह' घालणारी "तहान' भागविण्याचं ठिकाण असतं. बरं तिथंही हौस म्हणून नेहमी बारमधली "इंग्लिश' पिण्यापेक्षा "गावठी' बरी म्हणून तिची चव घेण्यासाठी गावात घराघरांसमोर गर्दी पहायला मिळते. गाववालेही मोठे हुशार असतात. अशा प्रसंगी तेही तयारीनेच असतात. अगोदरच ही दारू विकण्याचा "कोटा'ही ते तयार ठेवतात. कुणी दारूचा आस्वाद घेतल्यानंतर खमंग कच्चा चिवडयाचा आस्वाद घेतात. या निमित्ताने डोंगरकपारीतील गावक-यांनाही नवीन गृहउद्योग मिळतो.
डोंगरकपा-यातील फिरस्तीदरम्यान एक नवीनच परंपरा निर्माण होत असल्याचं लक्षात आलं. म्हणून गावात शिरून चौकशी केली. अवैधपणे दारू विक्री करणे नेहमीच कायदयाच्या विरोधात आहे. "ड्राय डे' ला गल्लीबोळांतून दारूची गंगा वाहणेही समजू शकतो. या गावांमध्ये कोंबडया, बक-या कापण्यावर अघोषित बंदी असल्याचं आढळलं. यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ग्रामस्थांनी सांगीतलेलं सत्य ऐकूण थोडा धक्‍काच बसला. "स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागात कोंबडे, बकरे कापले जात नाहीत. कारण आजचा दिन हा महत्वाचा असल्यामुळे कुणाची हत्या करू नये, असा या गावक-यांनी अंधविश्‍वास पोसला आहे. माझया डोक्‍यात एकाच वेळी अनेक प्रश्‍न निर्माण झाले. या लोकांना कुणी सांगीतलं की स्वातंत्र दिन किंवा प्रजासत्ताक दिनी हत्या करू नये म्हणून? महात्मा गांधी जयंती, हिंदू किंवा जैन धर्मियांसाठी असलेल्या पवित्र दिनी मासांहार वर्ज्य करणे, हे समजू शकतो. या दिवशी हत्या होत नसेल तर उत्तम. परंतु त्याला एक वेगळेच परिमाण लागू पाहातेय. धार्मिक अंधश्रद्‌धा पोसण्यासारखं स्वरूप या गोष्टीला येउ पाहतेय, हे कितपत योग्य?
जुन्या बाटलीत नवीन दारू ठेवण्यासारखं आहे. शिक्षणाबरोबर नवीन अंधश्रद्‌धा निर्माण होत असल्याचं दिसतं. आपण प्रतिकांची पुजा करायला लागलो की असेच धोके संभवतात.
                                                                                   विजयकुमार राउत
 
Blogger Templates