Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 20 अक्टूबर 2016

सुफींचा स्वच्छंद


परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. या निसर्गापासून आपण जसजसे दूर होऊ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न निर्माण करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. निखळ हास्य ही मानवाला मिळालेली अप्रतिम अशी देणगी आहे, आणि तोच त्याचा स्वभावही. वेद-उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे अन्नकोष, मनकोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असा तो प्रवास आहे. "अन हल हक'ची साद देत रस्त्याने मस्तीत नाचत सुटलेला सुफी संत मंसूर खऱ्या धर्माचे अंतरंग उलगडतो. सुफी संप्रदायाचे तत्वज्ञान जीवनाच्या लयीशी तादात्म्य साधण्याचा एक छंद आहे, असं म्हटलं तरी चालेल.
प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते.
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी.
निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्‍स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्‍य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल्‌ फरिद, इब्न अल्‌ अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्‍वराच्या भक्‍तीकडे जाण्याची निवडली.
शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्‍चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
"इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे.

विजयकुमार राउत
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा रोड , नागपूर
8888876462

गुरुवार, 13 अक्टूबर 2016

सुफींचा सर्वेश्‍वरवाद


                                                                                           विजयकुमार राउत

परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे " पिंडी ते ब्रम्हांडी' असा तो मामला आहे. एक मात्र खरे या निसर्गापासून आपण जसजसे दूर होउ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न मग ते मानसिक असो वा शारिरीक पातळीवर निर्माण होत जातात. पुढच्या काळात समाजात अधिकाधिक मानसिक समस्याच उद्‌भवणार, असे एकंदर संशोधन सांगते. या सर्व समस्यांवर आध्यात्मिक जिवन जगणे हेच अचुक उत्तर असू शकते, हे एकंदर महात्म्यांच्या जीवन जगण्याच्या पद्‌धतीवरून लक्षात येईल. वेद उपनिषादतील "अहं ब्रम्हास्मी' असो किंवा सुफी संत मंसूर यांनी ईश्‍वर भक्‍तीत बेधुंद होउन दिलेली "अन हलक' ही हाक किंवा बुद्‌धांचे "अत्त दीप भव' तिन्हीचा अर्थ एकच. फक्‍त शब्दांचा काय तो फरक !
अध्यात्म हे शरिर आणि मनाच्या पलिकडे जाउन थेट शुद्‌ध आत्म्यापर्यंत घेउन जाणारे एकमेव शास्त्र आहे. त्यासाठी मानवनिर्मीात देवाची पुजा किंवा अंधश्रद्‌धेत गुरफटण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. कुठलाही धर्म असो वा संप्रदाय हेच तत्व नेहमी सांगतो आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. म्हणून अनेक संकटातून ताठ उभा राहणारा समाजपुरूष निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. थोडक्‍यात काय तर विज्ञान म्हणजे नास्तीकांचं अध्यात्म आणि आस्तिकांचं विज्ञान म्हणजे अध्यात्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे.
भक्‍तीचे विविध प्रकार प्रत्येक पंथात व धर्मात पहायला मिळतात. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप पाडली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते.
वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकारापर्यंची नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे फकिरी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ; ऑर्थोडॉक्‍स होता, असे म्हटल्या जाते. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथी इसमांच्या विचारांना व मतांना इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनी हाच सर्वेश्वरवाद ; पॅनथीइझम प्रस्थापित केला. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे, असं संशोधकांचं मत आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे, असे म्हणता येत नाही. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो, असे सुफी लोक मानतात व तद्‌नुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात.
सुफी मत किंवा तसव्वुफ याची व्याख्या त्याच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली आहे. हे मत मान्य असणा-यांनाही "सुफी' म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. अभिजात सुफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सुफी गुरुच्या म्हणण्यानुसार सुफी मत म्हणजे दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे, हे सांगणारे शास्त्र होय. विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सुफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सुफी त्याला "मत' समजत नाही. परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सुफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्म हा अंधश्रद्‌धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज नेहमी चमत्कारांपुढे नतमस्तक होत असल्यामुळे मुळे प्रवाह गढुळ होउन जातो. तेव्हा ख-या अर्थाने धर्म मरतो आणि मग उरते फक्‍त धर्माचे निष्प्राण कलेवर.
विजयकुमार राउत

8888876462

रविवार, 11 सितंबर 2016

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

.....

                                                                                        *विजयकुमार राउत

"मी निर्गुण, निराकार आहे...मी अनादी अन्‌ मी अनंत आहे..असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण असोत किंवा फळ झाडावरून खालीच का पडते, असं विचारणारा न्युटन असो, जेव्हा तत्कालीन समाजाच्या डोक्‍याचा भूगा पाडून विचारांचा जळजळीत निखारा डोक्‍यात पेरून जातात तेव्हा ती माणसं हमखास विद्रोहीच ठरविली जातात. त्यांचे विचार काही लोकांसाठी उपहासात्मक जरी ठरले तरी त्या विचारांची नाड मात्र या मातीतून कदापी उखळून फेकता येणार नाही, हेच खरे. म्हणून ओशो रजनिशांना बुद्‌धाप्रमाणे जेवढे नाकारले जाते, तेवढेच समाजात स्वीकारलेही जाते, हेही सत्य आहे.
ओशो रजनिश एक विद्रोही व्यक्‍तीमत्व म्हणून 11 डिसेंबर 1931 रोजी जन्माला आले खरे.. परंतु त्यांच्या विचारांच्या शलाका शेकडो वर्षे भविष्यात प्रकाशमान होताना दिसतात. ओशो विश्‍वाच्या क्षितीजावर अलौकिक दिव्यत्वाने तेजाळून उठतात. फक्‍त व्यवहाराच्या चौकटीत फिट बसलेली भाषा समाजाच्या डिएनएत सुप्त वास करीत असते. तेव्हा मात्र अख्या पिढीची बौद्‌धीक आणि एकंदरीत शरिर रचनाच क्‍लिष्ट झालेली असते. यातील विरोधाभास असा की ती सर्वसामान्यांना कळणारी भाषाही कालांतरणाने लोकमान्य झाली तरी त्यातील अर्थ मात्र मेलेलाच असतो. मग आपण निष्प्राण झालेलं कलेवर खांदयावर घेउन वावरत असतो. म्हणून वारंवार बुद्‌ध, कबीर, ज्ञानेश्‍वरासारखे संत येउन माणसाच्या जगण्यातील गर्भितार्थ उलगडून जातात.
ओशोंनी केलेली वक्‍तव्ये मात्र एका नव्या वादास जन्म देणारी ठरली नाही, तरच नवल! "संभोगातून समाधी' असो किंवा त्यांच्या गुढ व्यक्‍तीमत्वाचा एकूण भाग असो. कृष्ण जसा पूर्ण पुरूष असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती लागत नाही तसेच ओशोचं व्यक्‍तीमत्वही पा-यासारखं हातून निसटून जातं. हेच असामान्य माणसाचं जीवन असतं. मग व्यक्‍तीमत्वातली गुढता येते कुठून? याचा विचार केला तर जीवन सरळ असते,..समजणा-याच्या मनातील आणि एकूण त्याच्या जगण्यातला गोंधळच मग व्यक्‍तीमत्वाची गुंतागुंत करून ठेवते. मेंदूतील न्यूरॉन्सच्या निर्मीतीतील प्रक्रियाच क्‍लिष्ट करून ठेवल्यामुळेच आपणंही "मल्टी डायमेंशनल' न होता "मल्टी सायकीक' झालेले असतो. मग अशा वेळी ओशोंसारख्यांच्या वक्‍तव्यात विरोधाभास शोधून त्यांच्यावर टिका होते. म्हणूनच महापुरूषांचे विचार तत्कालीन समाजव्यवस्थेला पचनी पडत नाही. महापुरूषांच्या हयातीत ते रूजताना पाहण्याची संधी त्यांना मिळत नसते. ओशो रजनिशांच्या बाबतीत नेमके तेच झाले.
खरं म्हणजे ओशो रजनिश मनाच्या कुठल्याशा कप्प्यातून मुक्‍त श्‍वासासोबत आपल्या अंतरंगात प्रवेश करतात. हळूच ऑक्‍सीजनसारखे रक्‍तातून मेंदूपर्यंतचा मार्ग शोधत जातात. नसानसात शितलता पेरून गार हवेसारखे संपूर्ण अंतरंगात झिरपणे हा त्यांचा स्वभाव असतो. हळूहळू मग मनाचा प्रदेश काबिज करून डोक्‍यातील मेंदूच्या प्रदेशावरही कब्जा मिळवितात. त्यांच्या बुद्‌धीची तेजस्विता अनेक वाद उकरून मेंदूतील कारस्थान झिडकारून लावते. जुनाट परंपरा नाकारून नवीन सृजनात्मकतेशी धागे जोडून देते. नास्तीक आणि आस्तिकेची मूळं अलगद खोदून काढते. ओशो एकंदर अस्तित्वाशी एकरूप होण्याचं वारंवार निमंत्रण देतात. बुद्‌धाप्रमाणे स्वयंदीप होण्याचा कानमंत्र देउन जातात. त्याबद्‌दल त्यांना जगाचे आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागतात. कुठल्या धर्माचं अनुयायीत्व न स्वीकारता कट्‌टरता सोडून स्वतःचा धर्म जागृत करण्यास सांगतात.
प्रज्ञेचं सळसळतं तेज घेउन ओशो नावाचं रसायन ब्रम्हांडातील अचेतन मनाच्या कृष्णविवरात अनेक दडलेल्या गुपितांचे एकेक पापुद्रे उलगडत जातं. असंख्य युगांपासून अस्तित्वाची ताटातूट झालेल्या अज्ञात विश्‍वाशी मग आपला परिचय व्हायला लागतो. आपल्याशी स्वतःला मिळवून देण्याचे अभिवचन देउन ते स्वतंत्र दृष्टी प्रदान करतात. तेव्हा गुरूजीएफप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा आपला अख्खा "गेस्टॉलच चेंज' झालेला असतो. दूर खोलवर पसरणारी मुळं आपल्या अपरिचित व्यत्मित्वातील दिव्यत्व शोधण्याकरीता स्वतःच स्वतःचं खोदकाम करतात. म्हणूनच जगाच्या पाठीवर त्यांना प्रवेश नाकारला जातो. शब्दात कितीही सांगीतले तरी त्याचा परिणाम होणारच नाही, हे जेव्हा कळायला लागते तेव्हा बुद्‌धाप्रमाणे ते सावधगीरी बाळगतात. जगातील महान पुरूषांनी वापरलेली मौनाची ताकद सर्वश्रेष्ठ असल्याचं मान्य करतात. कालांतराने ओशो निःशब्द होउन मौनात शिरतात ते यासाठी. त्यातून समाधीतील शून्यत्वाला अस्तित्वाशी एकरूप, एकसंध करून निराकारापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा करतात. " आय नो .. आय डोन्ट नो' असं म्हणणारा सॉक्रेटीस किंवा "जो जानता है वो बोलता नही.. और जो बोलता है वो जानता नही' हे सत्य सांगणारा चिनचा लोओत्सु ओशोच्या तत्वज्ञानातून थेट मूकसंवाद साधताना दिसतो.
जगाच्या व्यासपिठावर ओशो रजनिश एक अलौंकिक व्यक्‍तीमत्व असल्याचं आपल्याला थोडं उशीराच कळायला लागतं. त्यांच्या गूढवादी व्यक्‍तिमत्त्वाशी परिचय होण्यासाठी आपण त्यांना अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसंतसे ओशो क्षितीाजाच्या पलिकडे घेउन जाण्याचा स्पष्ट इशारा करतात. दृष्य आणि द्रष्टा यांच्याशी असलेलं तादात्म्य संपल्यावर एका अमर्याद अशा निराकाराशी तदृप होण्याच्या आनंदात ते शुन्यत्वाचं दर्शन घडवितात.
शब्दांची साथ सोडून शब्दांच्या पलिकडे पाहण्याचा वारंवार संकेत देतात. तरी हा संकेत कळण्याइतकी माणसं उत्क्रांतीतही एका अर्थानं उत्क्रांत झालेली नसतात. मग जगातल्या एकंदर कलांचा जन्म ज्या तत्वातून झाला त्या तत्वाची जडणघडण समजायला लागते. यासाठी ओशो कविता आणि शायरीचा आधार घेतात.

"संभोग से समाधी तक' या पुस्तकावर होणारे वाद-विवाद, समज गैरसमज किंवा आरोप-प्रत्यारोप हा पारंपरिक बुद्‌धीचे कारस्थानच असल्याचे सिद्‌ध होते. फ्राईड असो वात्सायन.. किंवा मायथॉलॉजीत संभोग हा विषय उपेक्षित म्हणूनच त्याचे विकृतीकरण केले जाते. "संभोगातून समाधी'पर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी पुस्तक न वाचता त्यांना दुषणं देणं अशा मेंदूचं काम असतं. हयात असतानाही आणि नसतानाही ओशो नावाचं गारूड जगातील असंख्य चाहत्यांच्या डोक्‍यातून काही केल्या उतरत नाही. बुद्‌ध, कृष्ण, महाविर, सुफी संत मंसूर , लाओत्से, कबिर ,मीरा, कन्फयूशिएस, गुरूजीएफ, खलील जिब्रान अशी कितीतरी नावं सांगावीत, त्या सर्वांशी रजनिश नाते सांगत जातात. ओशो समजने तर खुप दूरचे पण साधे वाचनेही पचनी पडत नाही. परमात्मा कही खोजने की चिज नही है . परमात्मा तो जानणे की चिज है' असं सांगत असताना आपल्यातील परम्यात्म्याशी जवळीक साधण्याचं बळ देउन जातात. म्हणून त्यांच्या समाधीवरील या ओळी आजही जिवंत वाटतात..
ओशो नेव्हर बॉर्न..नेव्हर डेथ्ड
ओनली व्हीजीटेड ऑन अर्थ प्लॅनेट !!
VRAUT90@YAOO.COM
 
Blogger Templates